शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘बाल-बिरादरी’मुळे गुन्हेगारीतील २५० मुले प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:56 IST

वास्तव्याचे ठिकाण, सभोवतालची परिस्थिती अन् घरातील संस्कार याचा परिणाम नकळतपणे लहान मुलांवर होत असतो़ शहरातील काही झोपडपट्ट्या या गुन्हेगारांच्या वास्तव्यामुळे गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात़ या ठिकाणी अवैध मद्यविक्री, जुगार, मटका असे प्रकार चोरी-छुपे तर कधी उघडपणे सुरू असतात़

नाशिक : वास्तव्याचे ठिकाण, सभोवतालची परिस्थिती अन् घरातील संस्कार याचा परिणाम नकळतपणे लहान मुलांवर होत असतो़ शहरातील काही झोपडपट्ट्या या गुन्हेगारांच्या वास्तव्यामुळे गुन्हेगारीचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात़ या ठिकाणी अवैध मद्यविक्री, जुगार, मटका असे प्रकार चोरी-छुपे तर कधी उघडपणे सुरू असतात़ त्यामुळे साहजिकच या वातावरणात वाढणारी मुले ही उमलत्या वयातच गुन्हेगारीकडे खेचली जातात़ या मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शहर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी काही महिन्यांपूर्वी समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘बाल-बिरादरी’ या प्रकल्पामुळे फुलेनगरमधील सुमारे २५० मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यात यश आले आहे़शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पंचवटी पोलीस ठाणे अंतर्गत असलेले फुलेनगर व सरकारवाडा पोलीस ठाणे अंतर्गत असलेली मल्हारखाण झोपडपट्टी हे दोन्ही भाग गुन्हेगारी घटनांमुळे नेहमीच प्रकाशझोतात असतात. सराईत गुन्हेगारांचे वास्तव्य, तथाकथित भार्इंचे उगमस्थान असलेल्या या परिसरातील वातावरण हे गुन्हेगारीस पोषक आहे़ या परिसरातील मुले अवैध मद्यविक्री वा यासारख्या लहान लहान कामांमधून गुन्हेगारीकडे वळतात़ या कामांनंतर ही मुले मोठ्या गुन्ह्यांकडे वळतात व पुढे गुन्हेगार होतात़ त्यामुळे झोपडपट्टी परिसरातील मुलांना लहान वयातच चांगले संस्कार, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावण्यासाठी छोट्या उद्योगाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी आयुक्त सिंगल यांनी बाल-बिरादरी हा प्रकल्प सुरू केला़ बाल-बिरादरी या प्रकल्पात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे एक स्रेहसंमेलनही पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आयोजित केले होते़ त्यामध्ये या मुलांनी रॅम्पवॉक, नाटके यांसह त्यांना शिकविण्यात आलेले विविध उपक्रम व त्यांच्यातील विविध सुप्त प्रतिभांचे सादरीकरण केले होते़ या उपक्रमात सहभागी मुलांना आयुष्याचे मोल तसेच व्यसन, गुन्हेगारी यामुळे होणारे नुकसान कळाले आहे़ सामान्य कुटुंबातील मुलांप्रमाणेच आपणही आपले आयुष्य जगणार असा संकल्प या मुलांनी केला असून, त्यानुसार आचरण सुरू केले आहे़गुन्हेगारीचे वातावरण असलेल्या शहरातील झोपडपट्ट्या हेरून या ठिकाणच्या गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांचा बाल-बिरादरी प्रकल्पात समावेश करणे़ या प्रकल्पातून या मुलांना शिक्षणासाठी मदत, व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी समुपदेशन, छोट्या-छोट्या स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मूळ प्रवाहात आणले जाणार आहे़ सर्वप्रथम फुलेनगरमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आल्यानंतर सद्यस्थितीत मल्हारखाण झोपडपट्टीत सुरू आहे़ स्वयंसेवी संस्था व पोलीस वेल्फेअरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला ‘बाल-बिरादरी’ हा प्रकल्प संपूर्ण शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राबविला जाणार आहे़  - डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिकविविध उद्योगांबाबत प्रशिक्षणपोलीस आयुक्तांनी शहरातील लहान मुलांसाठी काम करणाºया सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरू केलेला बाल-बिरादरी प्रकल्प सर्वप्रथम गुन्हेगारांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाºया फुलेनगर झोपडपट्टीत राबविण्यात आला़ या परिसरातील लहान वयोगटातील मुले मद्यविक्री करीत असल्याचे चित्र होते़ पोलीस आयुक्तालयातील कल्याण विभाग, सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुमारे सहा महिने हा प्रकल्प राबविण्यात आला़ गुन्हेगारीकडे वळलेली वा वळू पाहणारी सुमारे २५० मुले या उपक्रमात सहभागी झाली़ या परिसरातील मुलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहण्यासाठी समुपदेशन करणे, घरच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावता यावा यासाठी ज्वेलरी मेकिंग तसेच इतर उद्योगांबाबत प्रशिक्षण देण्यात आले़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयNashikनाशिक