शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रेशनमध्ये लवकरच तूरडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:53 IST

बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभाग: ७२० क्विंटल डाळ दोन दिवसांत पोहोचणार

नाशिक : बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.
तूरडाळींच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना तूरडाळ खरेदी करणे अशक्य झाल्याने जिल्हा पुरवठा विभागाने रेशनद्वारे सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ खरेदी करता यावी यासाठी शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसात पुरवठा विभागाला सदर डाळ प्राप्त होणार असून, रेशन दुकानांमधून तूरडाळ ५५ रु पये प्रतिकिलो दराने दिली जाणार आहे. ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दराने डाळ मिळावी यासाठी रेशनदुकानारांना डाळीची मागणी नोंदविण्याबाबत कळविण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे कडधान्यांचे नुकसान झाले. काढणीची पिकेही वाहून गेली. याचा फटका डाळींच्या पुरवठ्यावर झाल्यामुळे नवीन डाळ बाजारात येऊ शकली नाही त्यामुळे बाजारपेठेत डाळीचा तुटवडा निर्माण झाला.
मराठवाडा व विदर्भात कडधान्याची पिके घेतली जातात, परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तेथून येणारी डाळही वेळेत येऊ शकली नाही. राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र, यंदा सर्वत्र कडधान्याचे क्षेत्र घटल्यामुळे डाळींचा भाव वधारला आहे. दुकानांमध्ये उडीद १२०, तर मूगडाळ ११० रु पये किलो दराने विक्र ी केली जात आहे. दुसरीकडे या डाळींना मागणी वाढली असून, पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरबरा डाळ, उडीद, मूग आदींच्या किमतीनी प्रति किलो शंभरी पार केली आहे. डाळीच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांना डाळ खरेदी करणे मुश्किल झाले आहे. याचमुळे कार्डधारकांना वाजवी दरात तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली होती. मागील नोव्हेंबर महिन्यात ही मागणी करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत तूरडाळ डाळ प्राप्त होणार आहे.
तूरडाळीला उठाव नसल्यामुळे रेशनदुकानदारांकडून तूरडाळीची मागणी नोंदविली जात नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात असताना दुसरीकडे ग्राहक मात्र तुरडाळ मिळत नसल्याची तक्रार करीत आहेत, तर मागणी नोंदवूनही तूरडाळ प्राप्त होत नसल्याचे रेशनदुकानदारंचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवाळीपासून तूरडाळीचा पुरवठा अनिश्चित झाला आहे. आता घाऊक बाजारात तुरडाळींचे भाव शंभरच्या पुढे गेल्याने आता रेशनदुकानातून तूरडाळ प्राप्त होणार आहे. यासाठी पुरवठा विभाग गंभीर असून, रेशनदुकानदारांच्या मागणीकडे लक्ष ठेवणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार