शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मग महाआघाडीला सिंगल- डबल वॉर्डांची चिंता कशाला?

By संजय पाठक | Updated: January 22, 2021 17:58 IST

नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून सारेच पक्ष स्वबळावर सत्तेची भाषा करू लागले आहेत. मात्र, दुसरीकडे प्रभाग रचना सिंगल किंवा डबल करताना आपल्या पक्षाची कुवत ओळखुूनच मागणी करू लागले आहेत. सर्वच पक्षांकडे स्वबळ असेल तर मग व्दिसदस्यीय प्रभागांची मागणी कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीचे पडघमसाऱ्यांचे स्वबळाचे नारेवार्ड रचनेत मात्र सेायीची संख्या हवी

संजय पाठक, नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून सारेच पक्ष स्वबळावर सत्तेची भाषा करू लागले आहेत. मात्र, दुसरीकडे प्रभाग रचना सिंगल किंवा डबल करताना आपल्या पक्षाची कुवत ओळखुूनच मागणी करू लागले आहेत. सर्वच पक्षांकडे स्वबळ असेल तर मग व्दिसदस्यीय प्रभागांची मागणी कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना - काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीचे समीकरण अस्तित्त्वात आले. मुंबई महापालिकेसह राज्यात सर्वत्र महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार असल्यांचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात ते शक्य होईल काय, याविषयी शंका आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील अशीच चर्चा होती. या निवडणुका प्रत्यक्षात पक्ष चिन्हावर लढवल्या जात नाहीत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हेच पक्ष पॅनल करून एकमेकांच्या विरेाधात होते. महापालिकेच्या निवडणुकांना तर आणखी अवकाश आहे. परंतु शिवसेना ठीक आहे. परंतु सहा- सहा नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीनेदेखील स्वबळाची भाषा केली आहे.स्वबळाची भाषा करणे ठीक. मात्र, प्रभाग रचना कशी असावी, याबाबत मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली. तर शिवसेना आणि काँग्रेसने व्दिसदस्यीय प्रभाग पध्दतीची मागणी केली आहे. मुळात अशा प्रकारे आग्रह धरणारा पक्ष म्हणजे एकेकाळचे भाजप- सेनेचीच होती. राज्यात पहिल्यांदा युती सत्तेवर आल्यानंतर महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीची रचना केली होती. त्यावरून ओरड झाली खरी मात्र नंतर कधी व्दिसस्यीस, तर कधी चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. आता राज्यात सत्ता असताना भाजपने आणि त्याच वेळी शिवसेना युती म्हणून सत्तेत असताना २०१७ च्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग करण्यात आले. परंतु विद्यमान सरकारने ही रचना बदलण्याचे ठरवल्यानंतर खरे तर शिवसेना आणि काँग्रेस या देान्ही पक्षांनीराष्ट्रवादीची री ओढायला हवी होती. स्वबळाइतके सक्षम उमेदवार असतील तर दोन उमेदवारांना घेऊन एकाच्या आधाराने दुसरा निवडून आणण्याची मुळातच गरज नाही. त्यातच एक सदस्यीय प्रभाग पध्दतीत भाजप मागे पडते म्हणून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीला सुरूवात झाली असेल तर हा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडणारा नाही काय, असा प्रश्न आहे. खरे तर स्वबळ असेल तर कोणत्याही प्रकारची रचना असेल तर लढण्यास सज्ज असलेच पाहिजे, परंतु कार्यकर्त्याच्या उत्साहात भर घालताना दुसरीकडे मात्र स्वबळाची वस्तुस्थिती दाखवली जात आहे, हे तितकेच खरे आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसElectionनिवडणूक