शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून नाशिकचा गवळीपाडा झळकला राज्यात दुसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:30 IST

जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्दे ठिकठिकाणी रोपवन करून ते यशस्वीरीत्या गावकऱ्यांनी सांभाळले. गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय ३६७ हेक्टर वनक्षेत्रावर कु-हाड, चराईबंदी यशस्वीरित्या केली

नाशिक : ‘हजार हातांनी देणा-या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते ते अगदी खरे आहे. दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला असून नैसर्गिक ऋुतूचक्रही बिघडले आहे. याची जाणीव ठेवत वनांचे महत्त्व लक्षात घेता जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातीनल ननाशी वनपरिक्षेत्रातील गवळीपाडा (महाजे) या गावाने वनसंवर्धन करत ३६७ हेक्टर वनक्षेत्रावर कु-हाड, चराईबंदी यशस्वीरित्या केली. तसेच २०१४-१५साली ७५ हेक्टरवर रोपवनदेखील विकसीत केले. राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत ७५ हेक्टरवर पुन्हा या गावाने रोपवन घेतले. तसेच जल व मृदा संधारणाची कामे वनविभागाच्या साथीने पुर्ण केल्यामुळे गवळीपाड्याला संत तुकाराम वनग्राम योजनेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळविता आला.गवळीपाडा (महाजे) या भागातील लोकसहभागातून वनजमिनींवरील अतिक्रमणे काढण्यात आली. साग फुटव्यांचे संरक्षण करून साग जंगलात रूपांतर झाले. ठिकठिकाणी रोपवन करून ते यशस्वीरीत्या गावकऱ्यांनी सांभाळले. त्यामुळे गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकला. संत तुकाराम वनग्राम योजनेसाठी हे गाव पुढील वर्षासाठी राज्यस्तरीय फेरीकरिता पात्र झाले आहे. पश्चिम भागामधील विविध वनपरिक्षेत्रात अशा पद्धतीने लोकसहभागातून वनविकास आणि निसर्ग संवर्धन केले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांनी दिली.जल मृदसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बागायती पिकांचे उत्पादन आदिवासी शेतक-यांना घेणे शक्य होत आहे. जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.२०११-१२ सालापासून येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नागरिकांनी पुढाकार घेत ३६७ हेक्टर क्षेत्रावर चराई, कुºहाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्न केले. वनविभागाकडून सोपविण्यात आलेल्या या क्षेत्राची उत्कृष्ट पद्धतीने देखभाल करत क्षेत्रावरील वनविकास व संवर्धन करण्यावर भर दिला. वनपरीक्षेत्र अधिकारी रविंद्र भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव वनपाल आर.व्ही.देवकर,वनरक्षक हिरामण चौधरी यांनी लोकसहभागातून २०१४-१५साली वनविकास यंत्रणा योजनेअंतर्गत ७५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेतले. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत २० हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. तसेच जल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर दिला. जुन्या साग रोपवनाचेही संवर्धन यशस्वीपणे केले. त्यामुळे गवळीपाडा जिल्हास्तरावर संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या समितीला ५१ हजार रुपयांचे बक्षीसही मिळाले.

...असे केले निसर्गसंवर्धनजंगल राखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकारदरवर्षी हजारो रोपांची लागवड अन् संवर्धनजंगल परिसरात समतल चर खोदून पाणी अडविले.वनतळे, बंधारे, दगडी नाले बांधून जलमृदा संधारणाची कामे प्राधान्याने केली.जंगलात होणारी घुसखोरी थांबविली.चराई व कु-हाडबंदीचा निर्णय एकत्रित घेत अमलात आणला. 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकNatureनिसर्गenvironmentपर्यावरणwildlifeवन्यजीव