शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

स्मार्ट फोनने डायऱ्या, कॅलेंडरची बाजारपेठ केली काबीज, मागणी घटली : दैनंदिन कामाचे नियोजन मोबाइलवरच करण्याकडे कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:46 IST

नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या क्रांतिकारी बदलांमुळे स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण जगत प्रत्येकाच्या हातात सामावल्याचे पहायला मिळत आहे. हातातल्या स्मार्ट फोनमध्ये रोज घडणाऱ्या घडामोडींसह वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन आणि नोंदी ठेवणो शक्य झाले आहे. त्यामुळे तारीख, सण, वार पाहण्यासाठी भिंतीवरच्या कॅलेंडरकडे नजर टाकणारे व रोजच्या घडामोडींच्या नोंदी ठेवणारे ...

ठळक मुद्देस्मार्ट फोनच्या उपयोगितेमुळे डायऱ्यांना मागणी घटलीतारीख, सण, वाराचे नियोजन मोबाईलवर करण्याकडे कल माहिती व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे वाढली फोनची उपयोगिता

नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या क्रांतिकारी बदलांमुळे स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण जगत प्रत्येकाच्या हातात सामावल्याचे पहायला मिळत आहे. हातातल्या स्मार्ट फोनमध्ये रोज घडणाऱ्या घडामोडींसह वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन आणि नोंदी ठेवणो शक्य झाले आहे. त्यामुळे तारीख, सण, वार पाहण्यासाठी भिंतीवरच्या कॅलेंडरकडे नजर टाकणारे व रोजच्या घडामोडींच्या नोंदी ठेवणारे अनेकजण त्यांची ही दैनंदिन कामे स्मार्ट फोनवरच करू लागल्याने कॅलेंडर व डायऱ्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.गेल्या काही वर्षात स्मार्ट फोन्सची बाजारपेठ बघता बघता विस्तारली असून ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप आणि चॅटिंगचा पर्याय देणाऱ्या असंख्य सोशल साईट्स स्मार्ट फोनच्या एका क्लिकवर आल्या आहेत. त्याचबरोबर झपाटय़ाने नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, हातातील स्मार्ट फोनमध्ये संगणकाप्रमाणे काम करण्याची क्षमता आली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज असो वा सणवार असो प्रत्येक गोष्टीचे नियोजन व नोंदी हातातल्या स्मार्ट फोनमध्ये सामावल्या आहेत. त्यामुळे पयार्याने डायऱ्या व कॅलेंडरची गरज कमी झाल्याने त्यांचा ग्राहक वर्गही घटला असून, या डायऱ्या व कॅलेंडरची बाजारपेठ स्मार्ट फोनने काबीज केली आहे. सोशल साईटचा प्रचार होण्यासाठी स्वस्त दराने इंटरनेटची उपलब्धता, कमी किमतीतील अधिक फिचर्स असलेले स्मार्ट फोन, संवाद साधण्यात आलेली गती व विविध मोबाइल अ‍ॅप या कारणांमुळे तरु णाईच नव्हे, तर समाजातील लहान-थोरांसह सर्वच घटक स्मार्ट फोनकडे आकर्षित होत आहेत. ग्राहकवर्गाची वाढलेली गरज हे भारतीय कंपन्यांसह परदेशी कंपन्यांनीही चांगलेच हेरले आहे. त्यामुळे ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्यासाठी बहुतांश मोबाइल उत्पादक व ऑपरेटर कंपन्यांची चढाओढ लागली. अगदी स्वस्तात मोबाइल आणि हवे तसे इंटरनेट प्लॅन खास तयार केले जात आहे. ग्राहक मिळविण्यासाठी नेटवर्किग कंपन्यांचे जाळेही शहरासह ग्रामीण वाडय़ा-वस्त्यांकडे तयार झाले आहे. केवळ संवादाचे माध्यम नव्हे, तर बहुपयोगी झालेल्या स्मार्ट फोनने कॅलेंडर आणि डाय:यांची गरजच कमी केल्याने पयार्याने बाजारातही या वस्तूंचा ग्राहक कमी झाला आहे. नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर भेटवस्तू म्हणून दिल्या जाणाऱ्या डायऱ्याना मागणी असली तरी वैयक्तिक वापरासाठी डायऱ्या घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याची प्रतिक्रिया स्टेशनरी विक्रेत्यांकडून व्यक्त होत असून, कॅलेंडरच्या विक्रीतही मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दुकानदारांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :MobileमोबाइलNashikनाशिकMarketबाजार