शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शिवरायांचा स्त्री सन्मानाचा दृष्टिकोन आजही बाळगायला हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 16:00 IST

छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार-विचार आपण जपतेाय का,  असा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांच्या विचारांचे अनेक पैलू होते. त्यातील महिलांविषयक त्यांचे विचार अत्यंत संवदेनशील होते. स्त्रीचा सन्मान त्यात ओतप्रोत भरलेला होता. आज समाजातील अनेक घटना बघता शिवरायांचे हेच विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देमहिलांविषयी आदरशत्रूंच्या महिलांनाही संरक्षण

छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार-विचार आपण जपतेाय का,  असा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांच्या विचारांचे अनेक पैलू होते. त्यातील महिलांविषयक त्यांचे विचार अत्यंत संवदेनशील होते. स्त्रीचा सन्मान त्यात ओतप्रोत भरलेला होता. आज समाजातील अनेक घटना बघता शिवरायांचे हेच विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

छत्रपती शिवरायांचे स्त्रीसंबंधीचे धोरण स्वयंभूच होते. तथापि, मातोश्री जिजाऊंच्या शिकवणीमुळे राजांचे व्यक्तिमत्त्व अशा अंशाने आकार घेत गेले. बालवयात झालेले संस्कार दूरगामी परिणाम करणारी ठरत असतात. जिजाऊंना मातेच्या भूमिकेशिवाय प्रसंगानुरूप पित्याचीही भूमिका पार पाडावी लागे. या दोन्ही भूमिकेचे बाल शिवरायांनी चांगलेच अवलोकन केले असणार, परंतु शिवरायांच्या मनःपटलावर आईची छाप प्रभावी ठरल्यास नवल नाही.

बालशिवाजीने आईची दयाबुद्धी, उदार अंतःकरण, न्यायशीलता, जबाबदारवृत्ती आणि प्रसंगी कठोरपणा इत्यादी गुण तत्त्वे आत्मसात केली. परस्त्री मातेसमान लेखणारे, शत्रुपक्षाकडील स्त्रियांचाही सन्मान करणारे, प्रगतशील विचार बाळगून त्यावर अंमल करणारे, मध्ययुगीन काळात केवळ छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात. परंतु दुर्दैवाने त्यांची स्त्रीवादी भूमिका फारशी उजेडात आली नाही. डॉ. दिनेश मेारे लिखित ‘छत्रपती शिवरायांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन’ या पुस्तकात छत्रपती शिवरायांच्या भूमिकांचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. 

ज्या काळात बादशाही सरदार वतनदार वगैरे स्त्रियांना पळवून नेणे, अब्रू लुटणे, जनानखान्यात जबरीने कोंबणे, गुलाम करणे असे प्रकार करीत असत अशा अंदाधुंदीच्या काळात मराठी सैनिक शिवरायांचा आदेश शिरोधार्य मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करीत होते.

बादशाही सरदार युद्ध मोहिमेवर निघताना लवाजमाच घेऊन निघत. लढाईला निघाले की सैन्याबरोबर व्यापारी, साधनसामग्री, नर्तकी हे सर्वकाही यात असायचे. रणभूमीवर पराभूत झाल्यावर या स्त्रियांची कशी वाताहत होत असेल याची कल्पना न केलेली बरी. म्हणून शिवरायांचे धोरण काळाच्या फार पुढचा विचार वाटते. त्यांनी स्त्रियांची संभाव्य विटंबना टाळण्यासाठी आपल्या फौजेला सक्त ताकीद दिली होती की, आपल्याबरोबर छावणीत अथवा मोहिमेवर असताना धर्मपत्नी, कुळंबी अथवा रक्षाबरोबर घेऊ नये. मध्ययुगात शिवरायांखेरीज असे नियम इतर सत्ताधीशांनीही बनविलेले ऐकवितात नाही. मार्टिन नावाचा एक फ्रेंच अधिकारी कर्नाटक मोहिमेवर तीन दिवस होता. तो आपल्या रोजनिशीत लिहितो की,  शिवाजीराजांच्या छावणीमध्ये कसलाही भपका नव्हता, अनावश्यक सामानाची गर्दी नव्हती आणि स्त्रियांना तेथे संपूर्ण बंदी होती. 

स्त्रियांना मोहिमेवर आणू नये या नियमांची अंमलबजावणी तर झालीच. पण शत्रू पक्षाकडील स्त्रियांनाही कोणत्याच प्रकारचा त्रास देऊ नये याची जाणीवपूर्वक दखल शिवरायांनी घेतली. तसेच या नियमांचे आपले सैनिक पालन करतात की नाही यावर करडी नजर ठेवली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास जबर शिक्षा फर्मावली जात असे.

स्त्रियांसंबंधीच्या गुन्ह्याला अजिबात क्षमा नव्हती, मग तो कितीही मोठ्ठा सरदार असो. ‘फॉरीन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ या ग्रंथामध्ये युरोपियन लेखक म्हणतो, शिवाजींच्या सैन्यातील सर्व शिपायांना कोणाही स्त्रीस उपद्रव देता कामा नये, अशी सक्त ताकीद दिली होती. हा हुकूम जर कोणी मोडेल, तर त्यात इतकी कडक शिक्षा करण्यात येईल, की तिचा धाक इतर सैनिकांना बसून त्यांनी तसे कृत्य करण्यास धजू नये. शिवरायांच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा होता. म्हणून त्यांनी त्यासाठी शिक्षाही गंभीर ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ हातपाय तोडणे, डोळे काढणे अथवा देहदंड करणे इत्यादी.

शिवरायांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर स्वतः बादशहा औरंगजेब उद्गारला होता की, आपल्या हातात पडलेल्या शत्रूंचा स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. यावरून शिवरायांची स्त्रीविषयक उदार दृष्टी दिसून येते.

 - माधूरी दिपक भदाणे, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड

टॅग्स :NashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज