शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचा स्त्री सन्मानाचा दृष्टिकोन आजही बाळगायला हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 16:00 IST

छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार-विचार आपण जपतेाय का,  असा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांच्या विचारांचे अनेक पैलू होते. त्यातील महिलांविषयक त्यांचे विचार अत्यंत संवदेनशील होते. स्त्रीचा सन्मान त्यात ओतप्रोत भरलेला होता. आज समाजातील अनेक घटना बघता शिवरायांचे हेच विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देमहिलांविषयी आदरशत्रूंच्या महिलांनाही संरक्षण

छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार-विचार आपण जपतेाय का,  असा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांच्या विचारांचे अनेक पैलू होते. त्यातील महिलांविषयक त्यांचे विचार अत्यंत संवदेनशील होते. स्त्रीचा सन्मान त्यात ओतप्रोत भरलेला होता. आज समाजातील अनेक घटना बघता शिवरायांचे हेच विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

छत्रपती शिवरायांचे स्त्रीसंबंधीचे धोरण स्वयंभूच होते. तथापि, मातोश्री जिजाऊंच्या शिकवणीमुळे राजांचे व्यक्तिमत्त्व अशा अंशाने आकार घेत गेले. बालवयात झालेले संस्कार दूरगामी परिणाम करणारी ठरत असतात. जिजाऊंना मातेच्या भूमिकेशिवाय प्रसंगानुरूप पित्याचीही भूमिका पार पाडावी लागे. या दोन्ही भूमिकेचे बाल शिवरायांनी चांगलेच अवलोकन केले असणार, परंतु शिवरायांच्या मनःपटलावर आईची छाप प्रभावी ठरल्यास नवल नाही.

बालशिवाजीने आईची दयाबुद्धी, उदार अंतःकरण, न्यायशीलता, जबाबदारवृत्ती आणि प्रसंगी कठोरपणा इत्यादी गुण तत्त्वे आत्मसात केली. परस्त्री मातेसमान लेखणारे, शत्रुपक्षाकडील स्त्रियांचाही सन्मान करणारे, प्रगतशील विचार बाळगून त्यावर अंमल करणारे, मध्ययुगीन काळात केवळ छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात. परंतु दुर्दैवाने त्यांची स्त्रीवादी भूमिका फारशी उजेडात आली नाही. डॉ. दिनेश मेारे लिखित ‘छत्रपती शिवरायांचे स्त्रीविषयक दृष्टिकोन’ या पुस्तकात छत्रपती शिवरायांच्या भूमिकांचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. 

ज्या काळात बादशाही सरदार वतनदार वगैरे स्त्रियांना पळवून नेणे, अब्रू लुटणे, जनानखान्यात जबरीने कोंबणे, गुलाम करणे असे प्रकार करीत असत अशा अंदाधुंदीच्या काळात मराठी सैनिक शिवरायांचा आदेश शिरोधार्य मानून स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करीत होते.

बादशाही सरदार युद्ध मोहिमेवर निघताना लवाजमाच घेऊन निघत. लढाईला निघाले की सैन्याबरोबर व्यापारी, साधनसामग्री, नर्तकी हे सर्वकाही यात असायचे. रणभूमीवर पराभूत झाल्यावर या स्त्रियांची कशी वाताहत होत असेल याची कल्पना न केलेली बरी. म्हणून शिवरायांचे धोरण काळाच्या फार पुढचा विचार वाटते. त्यांनी स्त्रियांची संभाव्य विटंबना टाळण्यासाठी आपल्या फौजेला सक्त ताकीद दिली होती की, आपल्याबरोबर छावणीत अथवा मोहिमेवर असताना धर्मपत्नी, कुळंबी अथवा रक्षाबरोबर घेऊ नये. मध्ययुगात शिवरायांखेरीज असे नियम इतर सत्ताधीशांनीही बनविलेले ऐकवितात नाही. मार्टिन नावाचा एक फ्रेंच अधिकारी कर्नाटक मोहिमेवर तीन दिवस होता. तो आपल्या रोजनिशीत लिहितो की,  शिवाजीराजांच्या छावणीमध्ये कसलाही भपका नव्हता, अनावश्यक सामानाची गर्दी नव्हती आणि स्त्रियांना तेथे संपूर्ण बंदी होती. 

स्त्रियांना मोहिमेवर आणू नये या नियमांची अंमलबजावणी तर झालीच. पण शत्रू पक्षाकडील स्त्रियांनाही कोणत्याच प्रकारचा त्रास देऊ नये याची जाणीवपूर्वक दखल शिवरायांनी घेतली. तसेच या नियमांचे आपले सैनिक पालन करतात की नाही यावर करडी नजर ठेवली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास जबर शिक्षा फर्मावली जात असे.

स्त्रियांसंबंधीच्या गुन्ह्याला अजिबात क्षमा नव्हती, मग तो कितीही मोठ्ठा सरदार असो. ‘फॉरीन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ या ग्रंथामध्ये युरोपियन लेखक म्हणतो, शिवाजींच्या सैन्यातील सर्व शिपायांना कोणाही स्त्रीस उपद्रव देता कामा नये, अशी सक्त ताकीद दिली होती. हा हुकूम जर कोणी मोडेल, तर त्यात इतकी कडक शिक्षा करण्यात येईल, की तिचा धाक इतर सैनिकांना बसून त्यांनी तसे कृत्य करण्यास धजू नये. शिवरायांच्या दृष्टीने हा गंभीर गुन्हा होता. म्हणून त्यांनी त्यासाठी शिक्षाही गंभीर ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ हातपाय तोडणे, डोळे काढणे अथवा देहदंड करणे इत्यादी.

शिवरायांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर स्वतः बादशहा औरंगजेब उद्गारला होता की, आपल्या हातात पडलेल्या शत्रूंचा स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. यावरून शिवरायांची स्त्रीविषयक उदार दृष्टी दिसून येते.

 - माधूरी दिपक भदाणे, प्रदेशाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड

टॅग्स :NashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज