शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांची मालिका : धोकेदायक वळणामुळे तिघे ठार, अनेक जखमी

By admin | Updated: October 27, 2014 23:29 IST

संतप्त पाथरेकरांचा रास्ता रोको

पाथरे : सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पाथरे गावाजवळ धोकादायक वळण असून, या वळणावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत या वळणावर चार अपघात झाले असून, त्यात तीन जण ठार, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.गेल्या अडीच वर्षापूर्वी सिन्नर ते वावी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. वावीपासून पुढे उर्वरित शिर्डीच्या दिशेने नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंतच्या राहिलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दुसऱ्या टप्प्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. सदर रस्ता रुंदीकरणाच्या वेळी पाथरे गावाजवळील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अगोदर असलेल्या वळणापेक्षा रस्ता रुंदीकरणादरम्यान झालेले वळण आणखीणच धोकादायक झाले आहे. याठिकाणी असलेल्या पुलाचे व रुंदीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वीच पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे. तेव्हापासून या वळणावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. अगोदरपेक्षा रस्ता चांगला व रूंद झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर असलेले वळण वाहकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वळण असल्याबाबतचे कोणतेही फलक याठिकाणी नाही. याशिवाय या वळणावर रस्त्याच्या कडेला सुमारे २० फूट खोल खड्डा निर्माण झाला असून, याठिकाणी मोठ-मोठे दगड पडलेले आहेत. अनेक दुचाकींचे या वळणावर अपघात होऊन याठिकाणी असलेले दगड त्यांना गंभीर जखमी करीत आहेत. रात्री व पहाटेच्या वेळी सदर वळण वाहनचालकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात जात आहेत. याठिकाणी दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात वाहने कोसळून अनेकांना अपंगत्व येत आहे. रविवारी याठिकाणी कार उलटून झालेल्या अपघातात पिता-पुत्र ठार झाले. तर सोमवारी पहाटे उल्हासनगर (ठाणे) येथील युवकांची पल्सर (क्र. एम.एच.०५ सी. डी.११६५) दुचाकीचा या वळणावर अपघात झाला. त्यात रोशन उत्तम खोबंळे (२१) या युवकाला प्राण गमवावा लागला. त्यापूर्वी पहाटे याच वळणावर अपघात होऊन अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले. या वळणावर दोन दिवसात चार अपघात झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह शेतकरी संघटनेने सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी या वळणावर अपघाताचे प्रमाण वाढू लागल्यानंतर शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधितांना याबाबतचे निवेदन दिले होते. सोमवारी पहाटे दोन अपघात झाल्यानंतर शेतकरी संघटना व ग्रामस्थ संतप्त झाले. शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र चिने, नामदेव चिने, प्रकाश दवंगे, अमोल दवंगे, सोमनाथ घोलप, हेमंत चिने, बाळासाहेब गुंजाळ, सोमनाथ चिने, भरत गुंजाळ, नवनाथ खांडगे, अंकुश गुंजाळ, रवि चिने, योगेश चिने, अरुण नरोडे यांच्यासह ग्रामस्थांनी याठिकाणी रास्ता रोको केला. वावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजूत घातली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सदर वळणावर मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात यावे, वळणावर रस्त्याच्या कडेला पडलेले मोठ-मोठे दगड उचलून घेण्यात यावे, रस्त्याच्या कडेला असलेला मोठा खड्डा बुजविण्यात यावा, रस्त्याच्या कडेला लोखंडी खांब बसवून रेडियम लावण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. येत्या चार दिवसात अपघात रोखण्यासाठी वरील उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)