शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

मूर्तिकाराकडे हवी जिद्द अन् चिकाटी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 17:48 IST

सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शाडूमातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न भाविक करतात. परंतु शाडूमातीच्या मूर्ती घडविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. गेल्या तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणारे मूर्तिकार लोंढे कुटुंबीय नाशकात प्रसिद्ध आहे. केवळ मूर्तीकलाच नव्हे तर धातुकला, शिल्पकला यात देशभरात नावलौकिक मिळविलेले शिल्पकार संदीप लोंढे यांच्याशी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद..

ठळक मुद्देजिद्द आणि चिकाटी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.

मुकुंद बाविस्कर सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शाडूमातीच्या श्री गणेशाच्या मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न भाविक करतात. परंतु शाडूमातीच्या मूर्ती घडविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. गेल्या तीन पिढ्यांपासून शाडूमातीच्या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करणारे मूर्तिकार लोंढे कुटुंबीय नाशकात प्रसिद्ध आहे. केवळ मूर्तीकलाच नव्हे तर धातुकला, शिल्पकला यात देशभरात नावलौकिक मिळविलेले शिल्पकार संदीप लोंढे यांच्याशी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साधलेला संवाद..

 मूर्तिकला आणि शिल्पकला या क्षेत्राकडे आपण कसे वळालात?- नाशिक शहराला धातुकला, चित्रकला, मूर्तिकला आणि शिल्पकलेचा मोठा वारसा लाभलेला आहे. आमच्या लोंढे घराण्यालादेखील मूर्तिकला आणि शिल्पकलेचा असाच वारसा लाभलेला आहे. आमचे आजोबा सीताराम विठ्ठल लोंढे हे कर्मवीर दादासाहेब फाळके यांच्या फिल्म कंपनीसाठी या कलेचे काम करत. त्यानंतर माझे वडील कृष्णाजी लोंढे आणि काका सुधाकर लोंढे यांनी कलेचा हा वारसा जोपासला. त्यामुळे रोजच या कलेचे दर्शन होत असे. त्यातील बारकाव्यांचा कळत-नकळत अभ्यास करत गेलो. त्यातून आपोआपच या कलेकडे वळालो. एकेकाळी गणेशोत्सवातील श्रींच्या मूर्ती आणि देखावे हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जात असत. या उत्सवात असे नेमके काय वेगळेपण आहे?- साधारणत: १९७० ते १९९० या काळात नाशिकमधील गणेशोत्सव हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा होत असे. गणेशोत्सवात कोणती आरास करावयाची याबाबत गुप्त खलबते होत असत. मग मूर्तिकारांना आधीच कशा प्रकारची मूर्ती घडवायची याची संकल्पना सांगण्यात येई तर काही वेळा स्वत: मूर्तिकारालाच वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती बनविण्याचे अधिकार सार्वजनिक मंडळांकडून दिले जात. त्यातून रात्रंदिवस मेहनत करून आगळीवेगळी संकल्पना घेऊन मूर्तिकार मूर्ती घडवित असत.मूर्तिकला आणि शिल्पकला या क्षेत्रात कालानुरूप कसे बदल होत गेले?- पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन्ही प्रकाराने ही कला साधता येते तर कधी दोन प्रकारांचा संगम करून नवनिर्मिती घडवावी लागते. गणेशोत्सवाचे स्वरूपदेखील बदलत चालले आहे. पूर्वी वेगवेगळ्या ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांना खूप महत्त्व होते. आता आकर्षक विद्युत रोषणाईवर भर दिला जातो. आम्ही फक्त शाडूमातीच्या मूर्ती बनवितो. शाडूमातीच्या मूर्तीकडे लोक पुन्हा वळू लागले आहेत. प्रत्येकालाचा अशी मूर्ती बनविता आली आणि त्यांनी आपापल्या घरी या मूर्तीची स्थापना केली तर एक वेगळेच समाधान मिळेल. दोन दशकांचा शिल्पकलेचा प्रवास कसा होता?- शिल्पकला ही खूप अवघड कला आहे. देशभरात आम्ही अनेक शिल्पे व पुतळे उभारली आहेत. या क्षेत्रात काम करताना राज्य शासनाचा कला पुरस्कार मिळाला. या क्षेत्रात कष्ट, मेहनत खूप आहे. पूर्वी नाशिकला एकच चित्रकला महाविद्यालय होते. आता चार-पाच महाविद्यालये झाली आहे. कलाक्षेत्राकडे युवकांचा कल वाढतो आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणे अवघड नाही. परंतु त्यासाठी असावी लागते आवड; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे जिद्द आणि चिकाटी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.