शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शाळांचे शुल्क आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 19:52 IST

सुदर्शन सारडा । लोकमत न्यूज नेटवर्क ओझर : बाकड्यावर नाही तर आकड्यावर शाळेचा दर्जा ठरत असल्याने दिवसेंदिवस खासगी शाळांमध्ये पाल्याला टाकणे ही काळाची गरज ठरली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सरकारी अनास्थेमुळे खासगी शाळांच्या फी चे आकडे सामान्य माणसांना न परवडणारे झाले आहेत.

ठळक मुद्देआजचे पालक आपल्या मुलांना शाळेत टाकताना पहिलीच्या वर्गातील फी पन्नास हजार रुपये भरतोय हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

सरकारी शाळेत शिक्षण घेतल्यास समाज काय म्हणेल? या विचाराने अनेक पालक मानसिक विवंचनेत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणत जुन्या काळी सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आता लोप पावत चालल्या आहेत की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. शासकीय शाळेत दिल्या जाणाºया शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याची भावना जनमानसात रूढ झाली आहे. सामान्य माणसाला दुसरा पर्याय काय? अशी स्थिती आज आहे.याला नेमके जबाबदार कोण हा मुख्य मुद्दा असला तरी आज प्राथमिक शिक्षणापासून बोलणाºया शुल्काचे आकडे या शब्दाला सरकारचा अंकुश का नाही हा प्रमुख मुद्दा आहे.आज सरकारच्या शाळांमध्ये सुविधांचा अभाव असताना सामान्य पालकांना आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी आर्थिक तडजोडी कराव्या लागत आहेत.अनेक ठिकाणी पालक बोलताना त्याचा मुलगा त्या शाळेत आहे म्हणून आपला पण तेथेच टाका अशी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे नवरा- बायकोचे मतभेददेखील होत आहेत.नाशिकसह अनेक ठिकाणी फी व्यतिरिक्त बस, गणवेशसह वह्या-पुस्तके आमच्या येथूनच घ्यायच्या अशी अट घातली जाते. यातून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते. हल्ली मुलं गल्लीत खेळतानादेखील शाळेवरून त्यांच्यात भेदभाव होत आहेत. याला नेमकं जबाबदार कोण? हा मुख्य प्रश्न असताना सरकारी शाळेतील आजची अवस्था पाहता खासगी शाळांचे फावते असेच म्हणावे लागेल.खरेतर वाढलेल्या प्रचंड महागाईने आधीच सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले असताना आजच्या परिस्थितीत पालक म्हणून त्याला वर्षभर कमाविलेली मोठी पुंजी पाल्याच्या शिक्षणासाठी खर्च करावी लागत आहे. आज अनेक ठिकाणी पहिलीच्या वर्गातील फी लाखाच्या घरात आहे. येणाºया काही वर्षांमध्ये अजून यात मोठे बदल होतील अशा वेळेला गरीबाच्या मुलाने कौलारू गळक्या शाळेतच मुलाचे भविष्य पाहायचे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.