शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

शाळांचे शुल्क आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 19:52 IST

सुदर्शन सारडा । लोकमत न्यूज नेटवर्क ओझर : बाकड्यावर नाही तर आकड्यावर शाळेचा दर्जा ठरत असल्याने दिवसेंदिवस खासगी शाळांमध्ये पाल्याला टाकणे ही काळाची गरज ठरली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सरकारी अनास्थेमुळे खासगी शाळांच्या फी चे आकडे सामान्य माणसांना न परवडणारे झाले आहेत.

ठळक मुद्देआजचे पालक आपल्या मुलांना शाळेत टाकताना पहिलीच्या वर्गातील फी पन्नास हजार रुपये भरतोय हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

सरकारी शाळेत शिक्षण घेतल्यास समाज काय म्हणेल? या विचाराने अनेक पालक मानसिक विवंचनेत सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणत जुन्या काळी सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आता लोप पावत चालल्या आहेत की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. शासकीय शाळेत दिल्या जाणाºया शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याची भावना जनमानसात रूढ झाली आहे. सामान्य माणसाला दुसरा पर्याय काय? अशी स्थिती आज आहे.याला नेमके जबाबदार कोण हा मुख्य मुद्दा असला तरी आज प्राथमिक शिक्षणापासून बोलणाºया शुल्काचे आकडे या शब्दाला सरकारचा अंकुश का नाही हा प्रमुख मुद्दा आहे.आज सरकारच्या शाळांमध्ये सुविधांचा अभाव असताना सामान्य पालकांना आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी आर्थिक तडजोडी कराव्या लागत आहेत.अनेक ठिकाणी पालक बोलताना त्याचा मुलगा त्या शाळेत आहे म्हणून आपला पण तेथेच टाका अशी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे नवरा- बायकोचे मतभेददेखील होत आहेत.नाशिकसह अनेक ठिकाणी फी व्यतिरिक्त बस, गणवेशसह वह्या-पुस्तके आमच्या येथूनच घ्यायच्या अशी अट घातली जाते. यातून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते. हल्ली मुलं गल्लीत खेळतानादेखील शाळेवरून त्यांच्यात भेदभाव होत आहेत. याला नेमकं जबाबदार कोण? हा मुख्य प्रश्न असताना सरकारी शाळेतील आजची अवस्था पाहता खासगी शाळांचे फावते असेच म्हणावे लागेल.खरेतर वाढलेल्या प्रचंड महागाईने आधीच सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले असताना आजच्या परिस्थितीत पालक म्हणून त्याला वर्षभर कमाविलेली मोठी पुंजी पाल्याच्या शिक्षणासाठी खर्च करावी लागत आहे. आज अनेक ठिकाणी पहिलीच्या वर्गातील फी लाखाच्या घरात आहे. येणाºया काही वर्षांमध्ये अजून यात मोठे बदल होतील अशा वेळेला गरीबाच्या मुलाने कौलारू गळक्या शाळेतच मुलाचे भविष्य पाहायचे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.