शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

संत कबीरनगरात मूलभूत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:41 PM

गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भरण्यास तयार असतानाही मनपाकडून घरपट्टी आकारण्यास टाळाटाळ केली जात आहे.

समस्यांचा फेरा कबीरनगर वसाहतगंगापूर : गंगापूररोडवरील भोसला शाळेच्या मागे वसलेली संत कबीरनगर वसाहत ३० ते ३५ वर्षांपासून आहे. नाशिक महापालिकेने येथील काही रहिवाशांना घरपट्टी लागू केली तर अनेकांना त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत असून, नागरिक स्वत: घरपट्टी भरण्यास तयार असतानाही मनपाकडून घरपट्टी आकारण्यास टाळाटाळ केली जात आहे. घरपट्टी लागू झाल्यास नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्या लागतील म्हणूनच महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.संत कबीरनगरातील लोक सातपूरच्या औद्योगिक कारखान्यांमध्ये तसेच गंगापूररोडवर व्यवसाय करून उपजीविका भागवितात. महापालिका क्षेत्रात या वसाहतीचा समावेश असला तरी, सुविधा पुरविण्यात नेहमीच दुर्लक्ष केले जाते. या भागात घंटागाडी वेळेवर येत नाही, रस्ते अरुंद असल्याचे कारण देऊन महापालिका प्रशासनाने घंटागाडी बंद करून टाकली. त्यामुळे येथील नागरिक आपला कचरा नाशिक उजवा कालव्यात टाकतात. त्यामुळे परिसरात डास वाढल्याने डेंग्यू, चिकुनगुन्या, थंडी-ताप, मलेरिया यांसारखे आजार पसरण्याचा धोका संभवतो. संत कबीरनगर वसाहतीत पाणी कमी दाबाने आणि गढूळ येत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. हा भाग प्रभाग क्रमांक ८ मध्ये येतो. या भागात घंटागाडी बंद झाल्याने नागरिकांनी कचरा टाकायचा तरी कुठे असा प्रश्न संजू गव्हाणे यांनी केला आहे. अरुंद गल्ली व रस्ते असल्याने मोठी घंटागाडी वसाहतींमध्ये येत नव्हती; मात्र महापालिकेने नंतर छोटी घंटागाडी सुरू केली होती. नंतर ती बंद झाल्याने तो रस्त्याच्याकडेला अथवा पाटात टाकावा लागतो अशी तक्रार नंदू खोबे यांनी केली आहे.या भागात स्वच्छता मोहीम, औषध फवारणी धूर फवारणी करावी मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भीमराव दोंदे यांनी सांगितले. या वसाहतीत साधारण ३०० च्या वर झोपड्या आहेत घरपट्टी लागू करावी अशी मागणी वामन बेंडकुळे यांनी केली.लहान मुले चौकात खेळतात, त्यांच्या दृष्टिकोनातून परिसरात साफ सफाई झाली पाहिजे, रोजच्या रोज कचरा उचलला गेल्यास आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाही. गटारींची साफ सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी सुटली आहे.  - शशिकला साळवे, रहिवासी

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक