शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

कधी व्हायचं शुभमंगल सावधान? तिशी ओलांडली; पगार कमी, शेतकऱ्याला नवरी मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:28 IST

नाशिक - समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी प्रमाण, शिक्षणातील तफावत, नोकरी, उत्पन्नाविषयी असलेल्या वाढत्या अपेक्षा यांसह विविध कारणांमुळे तिशी-पस्तीशी उलटूनही ...

नाशिक - समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी प्रमाण, शिक्षणातील तफावत, नोकरी, उत्पन्नाविषयी असलेल्या वाढत्या अपेक्षा यांसह विविध कारणांमुळे तिशी-पस्तीशी उलटूनही अनेक तरुणांचे विवाह जुळून येण्यास अडचणी येत आहेत. त्यातच कमी पगार आणि शेतकरी मुलाला विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मोठ्या पगाराची नोकरी, शहरात स्वत:चे घर आणि वास्तव्यास असेल तरच स्थळ सूचवा, अशी पूर्व अट बहुतांश मुली आणि त्यांच्या पालकांकडून टाकली जात आहे.

मुले आणि मुलीचे लिंग गुणोत्तर अजूनही समान प्रमाणात नाही. आजही अनेकांना मुलगी ओझे वाटत असल्याने स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार घडतात. मात्र, गत दहा-पंधरा वर्षांत त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागात पस्तीशी उलटूनही ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उच्चशिक्षित, चांगली नोकरी आणि उत्तम कमाई असेल तर अशा मुलांचा विवाह लवकर जुळून येतो. मात्र, शेती, व्यवसाय आणि कमी पगाराची नोकरी करणाऱ्या मुलांचे विवाह रखडत आहे. त्यामुळे विवाह नोंदणी संस्थांमध्ये नोंदणीचे प्रमाण वाढत आहे.

म्हणून वाढतेय विवाहाचे वय

इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए, वकील, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यात किमान पंचवीस ते सत्तावीस वर्षं वय निघून जाते. त्यानंतर नोकरी शोधणे आणि स्थिरस्थावर होण्यात दोन-चार वर्षांचा कालावधी जातो. त्यानंतर विवाहाचा विचार केला जातो. तोपर्यंत किमान तिशी ओलांडून जाते.

वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टर

आयुष्याचा जोडीदार निवडता त्याचे शिक्षण आपल्या बरोबरीचे किंवा क्षेत्राशी निगडित असावे, असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे वकिलाकडून वकील, इंजिनिअरकडून इंजिनिअर, डॉक्टरकडून डॉक्टरला याप्रमाणे पेशानुसार जोडीदार निवडण्यास प्राधान्य दिले जाते.

 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीmarriageलग्न