शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

पंधरवड्यापासून रुसला वरुणराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:13 IST

शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्दे६७ मिमी पाऊस : गतवर्षी जुलैअखेर पडला २९८ मिमी पाऊस

नाशिक : शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.गेल्या काही दिवसांपासून पावसाची ओढ प्रत्येकाला लागली आहे. मेघ दाटून येत असले, तरी जोरदार सरींचे आगमन होत नसल्याने आता बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच वाढत्या आर्द्रतेमुळे वातावरणातील दमटपणा नागरिकांना घामाघूम करणारा ठरत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत शहरात असेच ढगाळ हवामान कायम राहणार असले तरी पावसाची खूप काही जोरदार हजेरी नसेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोरदार पाऊस झाला असला तरी शहरात मात्र हलक्या सरींचा वर्षाव झाला. या वीस दिवसांत शहरात केवळ ६७ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडे आहे.यावर्षी निसर्गाकडून फारशी कृपादृष्टी होत नसल्याचे सर्वांचेच मत झाले आहे. जूनपासून अद्याप ४३१ मिमी इतका पाऊस पडला आहे.श्रावणसरींच्या वर्षावाकडे लक्षकाही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या पुनर्आगमनाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहे. श्रावण मासात बरसणाऱ्या मध्यम व दमदार सरींच्या वर्षावाकडे बळीराजासह सर्वच नागरिक लक्ष ठेवून आहे. भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. तरीदेखील जोरदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.गेल्यावर्षी जून कोरडाठाक गेला होता; मात्र जुलैत पावसाने ती कसर भरून काढली होती. ६ जुलै २०१९ रोजी त्या २४ तासांच ७० मिमी इतका उच्चांकी त्या महिन्यातील पाऊस नोंदविला गेला होता. जुलैअखेर २९८.७८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गोदावरीही खळाळून वाहू लागल्याचे चित्र नाशिककरांनी बघितले होते. यंदा कोरोनामुळे वातावरणातील चैतन्य हरविले असताना दुसरीकडे पावसानेही दडी मारल्याने अधिक चिंता वाढली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी