शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पंधरवड्यापासून रुसला वरुणराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:13 IST

शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्दे६७ मिमी पाऊस : गतवर्षी जुलैअखेर पडला २९८ मिमी पाऊस

नाशिक : शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.गेल्या काही दिवसांपासून पावसाची ओढ प्रत्येकाला लागली आहे. मेघ दाटून येत असले, तरी जोरदार सरींचे आगमन होत नसल्याने आता बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच वाढत्या आर्द्रतेमुळे वातावरणातील दमटपणा नागरिकांना घामाघूम करणारा ठरत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत शहरात असेच ढगाळ हवामान कायम राहणार असले तरी पावसाची खूप काही जोरदार हजेरी नसेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोरदार पाऊस झाला असला तरी शहरात मात्र हलक्या सरींचा वर्षाव झाला. या वीस दिवसांत शहरात केवळ ६७ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडे आहे.यावर्षी निसर्गाकडून फारशी कृपादृष्टी होत नसल्याचे सर्वांचेच मत झाले आहे. जूनपासून अद्याप ४३१ मिमी इतका पाऊस पडला आहे.श्रावणसरींच्या वर्षावाकडे लक्षकाही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या पुनर्आगमनाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहे. श्रावण मासात बरसणाऱ्या मध्यम व दमदार सरींच्या वर्षावाकडे बळीराजासह सर्वच नागरिक लक्ष ठेवून आहे. भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. तरीदेखील जोरदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.गेल्यावर्षी जून कोरडाठाक गेला होता; मात्र जुलैत पावसाने ती कसर भरून काढली होती. ६ जुलै २०१९ रोजी त्या २४ तासांच ७० मिमी इतका उच्चांकी त्या महिन्यातील पाऊस नोंदविला गेला होता. जुलैअखेर २९८.७८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गोदावरीही खळाळून वाहू लागल्याचे चित्र नाशिककरांनी बघितले होते. यंदा कोरोनामुळे वातावरणातील चैतन्य हरविले असताना दुसरीकडे पावसानेही दडी मारल्याने अधिक चिंता वाढली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी