शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाईन विक्रीच्या निर्णयाला रुपाली चाकणकर यांचे समर्थन, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:25 IST

Rupali Chakankar News: राज्य सरकारचे वाईन विक्रीचं धोरण हे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे, आणि अद्यापही महिला आयोगाकडे या वाईन विक्रीसंदर्भात कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. तसेच अशा प्रकारे वाईन विक्री करू नये, अशी मागणीदेखील राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही

जळगाव - राज्य सरकारचे वाईन विक्रीचं धोरण हे आर्थिकदृष्ट्या योग्य आहे, आणि अद्यापही महिला आयोगाकडे या वाईन विक्रीसंदर्भात कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत. तसेच अशा प्रकारे वाईन विक्री करू नये, अशी मागणीदेखील राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही, अशा शब्दात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

रूपाली चाकणकर या ‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातच पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात १ हजारपेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातदेखील ४० बालविवाह रोखले गेले आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी बालविवाहांची संख्या खूपच जास्त आहे. तसेच काही ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्यांनी मुलींचे वय जास्त दाखवले आहे. अशा वाढत्या बालविवाहाच्या घटनांमुळे महाराष्ट्र २० ते २५ वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे कुठेही बालविवाह होत असेल, तर त्याला उपस्थित राहणारे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करावे, तसेच नोंदणी अधिकारी चुकीचे जास्त वय नोंदवत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी महिला आयोगाने मागणी केली असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.

महिलांच्या समुपदेशनसाठी जळगाव जिल्ह्यात चार केंद्र आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात न जाता अनेकांचे संसार वाचले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वन स्टॉप सेंटर आहे. मात्र फक्त जळगाव जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर नाही. हे आशादीप वसतिगृहात प्रस्तावित आहे. त्यासाठी जागादेखील जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून दिली आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती असावी, ज्या कार्यालयांमध्ये ही समिती नाही, त्या कार्यालयांना ५० हजार रुपये दंड आणि कंपनीची नोंदणी तात्काळ रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत. ही समिती नसेल, तर लैंगिक अत्याचारापासून महिलांना संरक्षण मिळत नाही, असेही त्या म्हणाल्या. शक्ती विधेयक लवकरच कायद्यात रूपांतरित होईल, याबाबत सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. महिलांवर अनेकदा राजकीय पुढारी टिपणी करतात. ही टिपणी करू नये, असेही त्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस यांचा हा राजकीय द्वेषअमृता फडणवीस यांनी मुंबईतील रहदारी संदर्भात जी काही वक्तव्ये केली आहेत. त्यात त्यांचा राजकीय द्वेष दिसून येतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण कुठं आणि कसं व्यक्त व्हावं, हे महत्त्वाचं आहे. आपल्या विचारांतून संस्कार आणि संस्कृती दिसते, ते महाराष्ट्र पाहतोय, असे सांगत यावेळी चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका केली. म्हणाल्या की, केंद्राने राज्याला काहीही मदत केली नाही. सापत्न वागणूक दिली. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. संसदेत ते निवडणुकीचा प्रचार करत आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत त्या म्हणाल्या की, चर्चेत राहणे हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यांना दुसरे फार काही माहिती नाही. त्याच्या प्रवक्त्त्यांना एक स्क्रीप्ट दिली जाते. त्यानुसार ते बोलत राहतात.

खडसे-दमानिया वादाची माहिती नाहीमाजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात अंजली दमानिया यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावर चाकणकर म्हणाल्या की, हा प्रकार घडला त्यावेळी मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नव्हते. त्यामुळे नेमके काय ते माहिती नाही, असं सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस