शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
5
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
6
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
7
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
10
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
11
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
12
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
13
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
14
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
15
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
16
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
17
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
18
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
19
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
20
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदत वाढ ; अजूनही दहा हजार विद्यार्थी प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 17:18 IST

आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. मात्र प्राथमिक शाळा सुरु होऊन पंधरवडा उलटूनही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरुच असून अजूनही दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना  तिसऱ्या सोडतीची प्रतिक्षा आहे

ठळक मुद्देआरटीईच्या दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी मुदतवाढशाळा सुरू होऊन पंधरवडा उलटूनही प्रवेश प्रक्रिया सुरुच प्रवेशप्रक्रियेतील उशीरामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

नाशिक : आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. मात्र प्राथमिक शाळा सुरु होऊन पंधरवडा उलटूनही आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरुच असून अजूनही दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना  तिसऱ्या सोडतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार केव्हा असा प्रश्न निर्माण झाला असून उशीरा प्रवेश मिळल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.  आरटीईच्या दुसºया सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली असून, आतापर्यंत केवळ एक हजार ५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अजूनही सुमारे नऊशे विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाही. त्यामुळे पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवारपर्यंत (दि.२९) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एसएमएसद्वारे सोडतीची माहिती पाठविण्यात आली असून, आरटीईच्या  संकेतस्थळावर लॉगइन करून अ‍ॅप्लिकेशन व्हाइज डिटेल्सयावर क्लिक करून अर्जक्रमांक टाकून पालकांना आपल्या अर्जाची स्थिती माहीत करून घेता येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अर्जाची स्थिती माहीत करून घेत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या  २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू असून,  एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिने झाल्यानंतर अखेर दुसरी सोडत जाहीर झाली आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर दुसऱ्या सोडतीतील प्रवेशांसाठी पहिल्यांदा मुदत वाढ दिली आहे. याप्रक्रियेत आतापर्यंत दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटल्याने अद्याप प्रवेशाची संधी न मिळालेले सुमारे दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे पालक तिसऱ्या सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकRight To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळाStudentविद्यार्थी