कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 06:05 PM2020-05-06T18:05:33+5:302020-05-06T18:05:40+5:30

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

 Rotor rotated by farmers on cabbage, sugarcane crop | कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

कोबी, शेवगा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटर

Next

लोहोणेर : - कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असतांना बळी राजाने भर उन्नाळ्यात भाव मिळत नसल्याने फळे भाजीपाला, कोबी, टमाटे तोडुन फेकावी लागत आहेत संचार बंदी घालण्यात आली असल्यामुळे उत्पादक शेतकरी आपला अतिशय कष्टाने पीकवुन शहर वासीयांना रोजच्या रोज ताजा भाजीपाला मिळावा म्हणून.देवळा, कळवण व इतर परीसरात लहान मोठ्या शेतकंर्यानी कोबी, टमाटे, मिरची, खंरबुज टरबुज, वांगी हे वान ( माळंव ) याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. पंरतु गेल्या ४० ते ४५ दिवसा पासुन लॉक डाउन मुळे कोणीही व्यापारी खरेदीसाठी इकडे फिरकत नसल्या कारणाने व खेड्या पाड्या सह तालुका स्तरावरील सर्व आठवडे बाजार बंद असल्या कारणाने ,शेतकंर्यानी घाम गाळुन पिकवलेला भाजीपाला विकावा कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबी, शेवगा, मिरची, टमाटे, इत्यादी लवकर खंराब होणारे पीक असल्याने ते तोडुन लगेच बाजारात विक्र ीसाठी नेणे गरजेचे आहे. पंरतु बाहेर मागणी जरी असली तरी तो माल खुडुन शहरा मध्ये विक्र ी साठी व्यापारी खरेदी करण्यासाठी येत नाहीत.
---------------------
देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील माजी सैनिक दीपक झाल्टे या प्रगतिशील शेतकर्याने आपल्या शेतातील ( गंट नं २७१ ) मध्ये ३० गुंटे तयार. कोबी पिकावर भाव मिळाला नाही दुंखत अंतकरनाने रोटर फिरवले असुन शासनाने भाजीपाला, फळे विक्र ी साठी पुढाकार घेऊन यंत्रना उभी करून आर्थिक मदतिचा हात द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच वर्षभर पाणी घालून तयार केलेला शेवगा पिक ही शेंगा निंबर झाल्या मुळे बुडा सकट तोडुन फेखण्या शिवाय पर्याय नसल्याचे दीपक झाल्टे यांचे म्हणणे आहे. तर दुसरी कडे टरबुज, खंरबुज या फळांना एिप्रल मे महीण्यात मोठी मागणी असते. रमजान व अक्षयतृतीया या धार्मिक सणाच्या काळात शहारात मोठ्या प्रमाणावर खप असल्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात या फंळाची लागवड केली आहे. पंरतु संचार बंदी असल्यामुळे मालेगाव सह, नाशिक, सुरत, अहमदाबाद कडचे व्यापारी देवळा तालुक्यात खरेदीसाठी फिरकत नसल्या कारणाने शेतकंर्याची फंळ शेतातच खंराब होत आहेत. थोड्या प्रमाणात शेतकरी हात विक्र ीने गांवो - गाव व तालुकास्तरा वर विकण्यास नेतांना दिसतो आहे. फळांचे वय वाढत असल्याने खंराब होऊन सडू लागली आहेत.

Web Title:  Rotor rotated by farmers on cabbage, sugarcane crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक