शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अंजनेरीच्या राखीव वनात रस्त्याचा घाट

By अझहर शेख | Published: October 17, 2020 1:06 AM

अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावपासून थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्ताव पश्चिम वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा रस्ता अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाच्या अखत्यारितीतील १७ ते २० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देनैसर्गिक जैवविविधता धोक्यात : मुळेगावपासून गडाच्या माथ्यापर्यंत रस्त्याचा प्रस्ताव

नाशिक : अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावपासून थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किलोमीटरचा पक्का रस्ता करण्याचा प्रस्ताव पश्चिम वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा रस्ता अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाच्या अखत्यारितीतील १७ ते २० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अंजनेरी राखीव वनाच्या पूर्वेच्या चतु:सीमेनुसार मौजे मुळेगावापासून तर थेट गडाच्या माथ्यापर्यंत सुमारे १४ किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठविला आहे. या रस्त्याचा फायदा केवळ गडावर वाहनांद्वारे जाण्यासाठी भाविकांना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गडावर कुठलीही लोकवस्ती नसल्यामुळे याव्यतिरिक्त रस्त्याचा कुठलाही फायदा सर्वसामान्यांना होणार नसल्याचे पर्यावरणप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे. राखीव वन संवर्धन घोषित असतानासुध्दा सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रशासनाकडून रस्त्याच्या प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ५६९.३६० हेक्टर राखीव वनक्षेत्रn नाशिकचे निसर्गवैभव असलेल्या अंजनेरी राखीव वनक्षेत्र हे नैसिर्गक जैवविविधतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थळ आहे. येथील जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने ३१ जानेवारी २०१७ साली अध्यादेश जारी करत नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या पश्चिम भागातील नाशिक वन परिक्षेत्रातील अंजनेरी गडावरील एकूण ५६९.३६० हेक्टर (५ हजार ६९३ चौ.किमी) क्षेत्र ‘राखीव संवर्धन’ म्हणून घोषित केले. या राखीव वनाची जपवणूक होणे गरजेचे असून त्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग