शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नदी, नाले तुुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:28 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, नद्या, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. ग्रामीण भागातील मातीच्या घरांसह अनेक घरांना पावसामुळे गळती लागली आहे.

ठळक मुद्देइगतपुरीत संततधार : वाकी खापरीतून दारणात विसर्ग

घोटी : इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, नद्या, नाले, तलाव तुडुंब भरले आहेत. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. ग्रामीण भागातील मातीच्या घरांसह अनेक घरांना पावसामुळे गळती लागली आहे.भाम आणि भावली ही धरणे पूर्ण भरल्यानंतर उर्वरित धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. वाकी खापरी धरणात ८० टक्के पाणीसाठा झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी महत्तम वेगाने पाणी सोडले जाते. आज या धरणातून दारणा धरणात वेगाने पाणी सोडण्यात आले. यामुळे प्रशासनाने धरणाच्या लाभक्षेत्रातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात ८०.४२ टक्के पाऊस झाला असून, संततधार सुरूच राहिल्यास दोन दिवसात वार्षिक पाऊस पूर्णत्व घेणार असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत २६७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.कोसळणाऱ्या पावसामुळे घोटी, इगतपुरी आदींसह प्रमुख गावांतील जनजीवन कोलमडले आहे. पावसामुळे भावली आणि भाम धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. वाकी खापरी धरणाच्या निर्मितीचे हे दुसरे वर्ष असून, दरवर्षी धरणात ८० टक्के पाणी साठल्यानंतर त्यावरील पाणी खबरदारी म्हणून सोडण्यात येते. हे पाणी दारणा धरणाच्या प्रवाहाला जाऊन पुढे मराठवाड्याकडे वळण घेते. महत्तम वेगाने पाणी सोडल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारपासून या धरणातून पाणी सोडले जात आहे.पावसामुळे अनेक भागातील गटारी, कारखाने आदींचे पाणी मुख्य प्रवाहात समाविष्ट झाले आहे. यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरी, विंधनविहिरी, नद्या यामध्ये अशुद्ध आणि दूषित पाणी आहे. शेतीच्या कामांचा वेग मंदावलाशेतीच्या कामांना आलेला वेग सततच्या पावसामुळे मंदावला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पावसामुळे जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धरणे असून, राज्यातील अनेक भागांचे जीवनमान येथे पडणाºया पावसावर आधारित असते. त्यानुसार इगतपुरीत पडणाºया पावसावर अनेकांच्या नजरा खिळलेल्या असतात. यावर्षी उशिरा सुरू झालेला पाऊस विक्र म मोडीत काढणारा ठरला. तालुक्याच्या सर्वच भागात कोसळधारा सुरूच आहे. प्रमुख पीक भाताच्या लागवडकाळात पाऊस चांगला होत असल्याने यंदा भाताचे विक्र मी उत्पादन होणार असल्याचे संकेत आहेत.रस्त्यांची झाली दैनाविविध गावांतील रस्त्यांची अवस्था पावसामुळे भीषण अवस्थेकडे आहे. रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये तलाव निर्माण झाले आहे. इगतपुरी, घोटी, वैतरणा, वाडीवºहे, टाकेद बुद्रुक, साकूर फाटा, धामणगाव, पिंपळगाव मोर आदी भागातील रस्त्यांना दैन्यावस्था प्राप्त झाली आहे. इगतपुरी शहरातल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांचा रोष वाढतो आहे.