शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

निर्बंधांचा शेतीमालाला फटका; द्राक्षांची कवडीमोल दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 5:32 AM

 नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो.

संजय दुबबळेनाशिक : कोरोनाच्या संकटामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचा मोठा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, तर राज्यातील निर्बंधांमुळे भाजीपाल्याचे दरही घसरले आहेत.  यावर्षी जिल्ह्यातून केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. कांद्यालाही कोरोनाचा फटका बसला.

आठ दिवसांनंतर सुरू झालेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा दरात काहीशी सुधारणा होऊन उन्हाळ कांदा सरासरी १,३२० रुपये तर लाल कांद्याला सरासरी १,१८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फळभाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. नाशिक येथून मुंबई, औरंगाबादसह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी बाजारपेठांमध्ये शेतमाल जातो. मुंबईत काही भागात रस्त्यावर बसून भाजी विक्री करू दिली जात नसल्याने व्यापारी मालाची खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. 

टेबल आणि वाईन दोन्हीही द्राक्षांना फटका

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी विदेशातून होणारी द्राक्षांची मागणी घटली. त्यातच केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीला देण्यात येणारे अनुदान बंद केल्याने द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला. त्यातही द्राक्षाला खूप चांगला दर मिळाला नाही. निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात आले; पण तेथेही दर कोसळल्याने उत्पादकांचा खर्चही वसूल झाला नाही. याउलट वाईन द्राक्षांना भाव मिळाला; पण वायनरी चालकांकडून अपेक्षित खरेदी झाली नाही.

केळीच्या व्यापारात घट

-अजय पाटीलजळगाव :  जिल्ह्यातील केळीच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. रावेर व जळगाव बोर्ड भावाप्रमाणे केळीचे दर १,४०० रुपयांपर्यंत असले तरी व्यापारी केवळ ८०० रुपये प्रतिक्विंटल या दराने मालाची उचल करत आहेत.जळगाव जिल्ह्यातून जम्मू काश्मीर, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केळी पाठविली जाते. सद्य:स्थितीत नवती मृग बागाची काढणी सुरू आहे. या हंगामात दररोज जिल्ह्यातून सुमारे २ हजार टन माल बाहेर पाठविला जातो. मात्र, यंदा त्यात काही प्रमाणात घट झालेली पाहावयास मिळत आहे. व्यापारी माल काढण्यासाठी वेळेवर येत नाहीत. 

टरबूज शेतातच- गणेश आहेरअहमदनगर : कोरोनाच्या सावटाने बाजारपेठा बंद असल्याने सध्या टरबूज शेतातच पडून आहे. थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते; परंतु मागील वर्षापासून कोरोना संक्रमण काळात टरबूज उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. टरबूज पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात दोन हजार एकर शेतजमिनीवर टरबुजाची लागवड करण्यात आलेली आहे. बी-बियाण्यापासून कीड लागू नये म्हणून अनेक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याची शेतकऱ्यांची स्थिती आहे. महिन्यापूर्वी टरबुजांच्या वेली कळी अवस्थेत असताना अचानक तापमान वाढले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या टरबूज वेली करपून गेल्या तर काही ठिकाणी वेलीच्या कळ्यांची गळ झाली.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या