शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

डाळिंबाला विक्रमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:11 IST

लासलगाव : येथील बाजार समितीने सुरू केलेल्या डाळिंब लिलावास शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी बाजारभाव कमीत कमी २०० रुपये व जास्तीत जास्त २१०० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे सर्वाच्च दर मिळाले आहेत.

ठळक मुद्देउत्पादकांमध्ये समाधान : लासलगाव बाजार समितीत आतापर्यंत ६१,३२४ क्रेट्सची विक्री

लासलगाव : येथील बाजार समितीने सुरू केलेल्या डाळिंब लिलावास शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी बाजारभाव कमीत कमी २०० रुपये व जास्तीत जास्त २१०० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे सर्वाच्च दर मिळाले आहेत.परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांची विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या डाळिंब हंगामात लासलगाव मुख्य बाजार आवारावर दररोज सकाळी ९.३० ते दुपारी १ अथवा आवक संपेपर्यंत डाळिंबाचे लिलाव सुरू केलेले आहेत. डाळिंब उत्पादकांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करून एकसारखा डाळिंब २० किलोच्या क्रेट्समध्ये विक्रीस आणल्यास जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे. किडका, पिचका, लहान, खर्डा असलेला डाळींब वेगळ्या क्रेट्समध्ये विक्रीस आणल्यास त्याची खरेदी करणारे व्यापारी येथे उपलब्ध असल्याने डाळिंबाच्या प्रतीप्रमाणे शेतकरी बांधवांना बाजारभाव मिळत आहे. डाळिंबाची विक्री उघड लिलावाद्वारे होत असून, स्थानिक अडत्यांबरोबर अनेक परप्रांतीय व्यापारी लिलावात सहभाग घेत असल्याने स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकºयांना उच्चतम बाजारभाव मिळत आहे. लिलावानंतर लगेच इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप व रोख चुकवती मिळत असल्याने उत्पादक माल विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीला पसंती देत आहे. चालू हंगामात दि. १३ जुलैपासून आजपर्यंत ६१,३२४ क्रेट्स डाळिंबाची विक्री झाली आहे. लॉकडाउनमुळे बाजारसमितीत कांद्याचे दर कमी होत असताना डाळिंबाला मिळालेल्या दराने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आणखी काही दिवस दर असेच टिकून राहण्याची अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे. बाजार आवारात प्रामुख्याने शेंद्रा, आरक्ता, भगवा या जातीच्या डाळिंबाची आवक होत आहे. व्यापारीवर्गाने खरेदी केलेला डाळिंब हा शेतमाल प्रामुख्याने दिल्ली, बडोदा, अलिगड, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांसह देशातील इतर बाजारपेठेत पाठविला जात आहे. सध्या राज्यातील नाशिकसह अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. ४लासलगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भविष्यात डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. डाळिंब विक्रीस सोईचे ठिकाण म्हणून लासलगाव बाजारपेठ शेतकºयांना नवा पर्याय निर्माण झाला असून, डाळिंबाच्या खरेदी-विक्रीस प्रतिसाद मिळाल्यास कांद्याबरोबरच डाळिंब विक्रीसाठी बाजार समिती नावारूपास येणार असल्याचे सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी