शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांद्याची विक्रमी आवक

By admin | Updated: December 22, 2015 00:02 IST

निर्यातमूल्य : आगामी काळात भाव घसरण्याचा जाणकारांचा अंदाज; शेतकरी अडचणीत

येवला : येवला बाजार समितीत सोमवारी ११२० ट्रॅक्टरमधून २३ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या हंगामातील ही विक्र मी आवक असून, कांदा बाजारभाव सध्या स्थिर असल्याचे चित्र असले, तरी निर्यातमूल्य जर किमान २०० रु पये प्रति डॉलरपर्यंत कमी झाले नाहीत तर निर्यातीचे गणित कोलमडेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव घसरतील व शेतकऱ्यांची चिंता वाढेल, असा अंदाज जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.येवला मार्केट यार्डवर कांद्याचे बाजारभाव किमान ५०० ते १४५१ रु पये असून सरासरी १०५० रु पये प्रती क्विंटल होते. येवला बाजार आवारात नांदगाव, वैजापूर या तालुक्यातील सुमारे ७० टक्के तर येवला तालुक्यातून केवळ ३० टक्के कांदा येवला बाजार आवारात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. सध्या सर्वच कांदा बाजारात आवक वाढत आहे. कांद्याचे निर्यातमुल्य ७०० रुपयावरून ४०० रुपये प्रती डॉलर एवढे कमी केले असले तरी निर्यात फारशी समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. चीन मध्ये कांदा निर्यातमूल्य केवळ ३०० रुपये प्रती डॉलर आहे.तर पाकिस्तान मधील कांदा निर्यातमूल्य शून्य आहे. भारतात कांदा निर्यातमूल्य सध्या ४०० रु पये प्रती डॉलर आहे. या परिस्थितीत, चीन व पाकिस्तानचा कांदा, श्रीलंका, दुबई, सिंगापूर, फिलिपिन्स, मलेशिया या देशात निर्यात केला असता त्या देशात हा कांदा पोहोचेपर्यंत त्याचे मूल्य १८०० ते २००० रु पये प्रतिक्विंटलपर्यंत जाते. या तुलनेत भारताचा कांदा निर्यातीनंतर त्याचे परदेशातील मूल्य २२०० ते २४०० रु पये प्रतिक्विंटलपर्यंत जाते. त्यामुळे निर्यातदार नाखूश आहेत. व्यापारात दोन पैसे मिळाल्याशिवाय निर्यात कशी शक्य आहे. भारतीय कांदा अन्य देशाच्या तुलनेत महाग असल्याने परदेशातून भारतीय कांद्याला मागणी अत्यंत कमी झाली आहे. सध्या परदेशात चीन आणि पाकिस्तानच्या कांद्याने बाजारपेठ काबीज केली आहे. कांद्याची निर्यात कमी होत असली तरी आगामी १० ते १२ दिवसांनंतर भारतात आंतरराज्यीय बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा अधिक होण्याची शक्यता असल्याने आगामी १२ ते १५ दिवसात कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत सापडेल. निर्यातमूल्य शून्य करावे गेल्या महिनाभरात सरासरी कांद्याचे बाजार भाव २२०० रु पये प्रती क्विंटल पासून एक हजार पन्नास रु पये पर्यंत घसरले आहेत.आता निर्यातमूल्य ४०० रु पये प्रती डॉलर केल्याने कांद्याला स्थिर भाव देण्यास मदत होणार असल्याचा अंदाज होता. परंतु निर्यात मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या तुलनेत अधिकच असल्याने हवी तेवढी निर्यात होत नसल्याने निर्यातमूल्याचा फटका अजूनही बसत आहे. सध्या देशांतर्गत मागणीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कांदा देशातच राहत आहे. शिवाय कांद्याची आवक वाढत असल्याने देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर कांद्याचे भाव कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. केंद्राने कांद्याचे निर्यात मूल्य शून्य केले, तर देशांतर्गत कांद्याची गरज पूर्ण होवून परदेशात कांदा निर्यांत होईल व देशांतर्गत कांद्याचे भाव ंकोसळणार नाहीत, आता केंद्राने शेतकरी हिताची भूमिका पार पाडावी लागेल. आगामी दोन महिन्यात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा येणार आहे.