शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाचे ‘पालकत्व’ निभावू शकणारे नेतृत्वच होणार स्वागताध्यक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:33 IST

नाशिक : दीड दशकानंतर नाशिकला होणाऱ्या यंदाच्या साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष कोण होणार, याबाबतच्या चर्चेला बहर आला आहे. साहित्य ...

नाशिक : दीड दशकानंतर नाशिकला होणाऱ्या यंदाच्या साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष कोण होणार, याबाबतच्या चर्चेला बहर आला आहे. साहित्य संमेलनाचे ‘पालकत्व’ निभावू शकणाऱ्या नेतृत्वालाच यंदाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान देण्यात येणार असल्याची शहरातील साहित्य वर्तुळात चर्चा आहे.

कोणतेही साहित्य संमेलन भरवायचे म्हटले की त्यात सर्वप्रथम दोन नावांची चर्चा सर्वाधिक होते. त्यात पहिले असते ते संमेलनाध्यक्ष, तर दुसरे असते स्वागताध्यक्ष. त्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे स्थानिक साहित्यिक, नेतृत्व श्रेणीतील असते. त्यानुसार नाशिकच्या प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीदेखील अशाच दमदार नेतृत्वाकडे स्वागताध्यक्ष पद सोपवले जाण्याची चर्चा आहे. त्यासाठी संबंधित नेतृत्वाची मनधरणी करण्यासाठी रविवारी (दि.१०) बैठक होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. अर्थात, स्वागताध्यक्षांची अधिकृत निवड होण्यापूर्वी अस्थायी समिती आणि स्वागत समिती नेमण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या दोन्ही समित्यांची बैठक होऊन त्यात सर्व अधिकार संबंधितांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय होईल. त्यानंतर येत्या आठवडाभरात स्वागताध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकणार आहे. त्यानंतर दोन दिवसात म्हणजेच येत्या आठ-दहा दिवसांत स्वागताध्यक्षपदाची अधिकृत घोषणा होण्याची चिन्हे आहेत.

इन्फो

नाशिकमधील परंपरा

नाशिकमध्ये यापूर्वी १९४२ साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अष्टपैलू साहित्यिक संपादक आचार्य अत्रे होते. मात्र, त्या काळात स्वागताध्यक्ष असे स्वतंत्र पद निर्माण करण्याची परंपरा नसल्याने त्या संमेलनासाठी कोणीही स्वागताध्यक्ष नव्हते. मात्र, २००५ या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनासाठी आमदार डॉ. वसंत पवार यांनी पुढाकार घेत औरंगाबादला जाऊन महामंडळाला निमंत्रण देण्यासह तब्बल ६३ वर्षांनी संमेलन नाशिकला खेचून आणले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. वसंत पवार, तर संमेलनाच्या अध्यक्षपदी केशव मेश्राम होते. त्यामुळे आता नवीन स्वागताध्यक्षपदीदेखील नाशिकच्या सक्षम नेतृत्वाचीच निवड होण्याची चर्चा आहे.