शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

पालेभाज्यांचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:21 IST

नाशिक : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे परिणामी बाजारसमितीमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. यामुळे किरकोळ ...

ठळक मुद्देपावसाचा फटकाआवक घटल्याने दरात वाढकोथिंबीरीच्या जुडीला १०० ते १५० रुपये भाव

नाशिक : जिल्ह्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे परिणामी बाजारसमितीमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वधारले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल पुर्णपणे खराब झाल्याने परिणामी बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटत आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव गगणाला भिडले आहेत. पावसामुळे कोथिंबीरीचे मोठे नुकसान झाल्यामुळे कोथिंबीरीच्या जुडीला १०० ते १५० रुपये भाव मिळत आहे.        मागील आठवड्यापर्यंत भाज्यांचे दर आटोक्यात होते पण या आठवड्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सर्वच भाज्याची आवक घटली असून परिणामी याचा फटका भाज्यांच्या किंमतीवर होतांना दिसुन येत आहे. त्यामुळे सामान्य माणसांच्या जेवणातून भाजीपाला गायब होत आहे. ग्राहक भाजीपाला खरेदी करतांना विचार करुन भाजी विकत घेत आहे. कोथिंबीर, मेथी, शेपू, टॉमेटोचे यांचे भाव वाढले असल्याने ग्राहक या भाज्यांकडे दुर्लक्ष करत इतर भाज्या घेण्यातच समाधान मानत आहे. भेंडी, चवळीच्या शेंगा, वांगे, गवार, दुधी भोपळा, दोडका, फ्लावर,कोबी यांचे दर कायम आहे. आवक पुन्हा वाढल्यास भाव पुन्हा पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे.पालेभाज्यांचे दरकोथिंबीर : १०० ते १५० रुपये जुडीशेपू : २० ते ३५ रुपये जुडीपालक : १० ते २० रुपये जुडीकांदापात : २० ते ३० रुपये जुडीमेथी : २५ ते ४० रुपये जुडीजादा पाण्यामुळे तसेच वाहतुकीदरम्यान पावसामुळे भाजीपाला सडत असल्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे नुकसान झाल्याने मार्केटमध्ये हवा तसा भाजीपाला उपलब्ध होत नाही. तसेच आवक घटल्याने मार्केटमध्ये येणाºया जेमतेम भाजीपाल्याला मोठा भाव मिळत असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढले आहे.गजराबाई गोडसे, भाजीपाला विक्रेती

टॅग्स :Nashikनाशिकvegetableभाज्याMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी