शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

‘राज्यराणी’ नांदेडपर्यंत नेण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:36 PM

मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा विरोध : रेल्वेची परतीची वेळ बदलण्याची मागणी

नाशिकरोड : मनमाड-सीएसटी राज्यराणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याच्या कारणावरून रेल्वे प्रशासनाकडून राज्यराणी नांदेड-सीएसटी चालविण्याचा घाट घातला जात आहे. राज्यराणीची परतीची वेळ बदलावी, दादरला थांबा देऊन प्रायोगिक तत्त्वावर गाडी चालवून निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.नाशिककरांसाठी मुंबई-ठाणे आदि भागात दररोज ये-जा करण्यासाठी राज्यराणी, पंचवटी, गोदावरी या तीनच गाड्या आहेत. राज्यराणीला लासलगाव, निफाड व सर्वांत महत्त्वाचा दादर थांबा नाही. तसेच सीएसटीवरून येणारी राज्यराणीची वेळ चुकीची असल्याने तिला प्रवाशांचा योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे नांदेड-सीएसटी राज्यराणी करून तसे वेळापत्रक करण्याचा घाट घातला जात आहे.तत्कालीन स्व. माजी खासदार डॉ. वसंत पवार यांनी नाशिककरांना मनमाड-सीएसटी तपोवन एक्स्प्रेस मिळवून दिली होती. काही वर्षे मनमाड-सीएसटी चाललेली तपोवन एक्स्प्रेस पुढे नांदेड-सीएसटी करण्यात आली. मध्य रेल्वेची वर्षभर चालणारी ही एकमेव गाडी असून नांदेडवरूनच भरून येणाऱ्या तपोवनमध्ये नाशिककरांची हक्काची तपोवन पाठोपाठ मनमाड-पुणे रेल्वे भुसावळ-पुणे करण्यात आली. आता रेल्वे प्रशासनाकडून नाशिककरांची हक्काची व गरजेची राज्यराणी पळविण्याचा घाट घातला जात आहे.‘राज्यराणी’ची परतीची वेळच चुकीचीमनमाडवरून पहाटे ५.२५ ला सुटणारी राज्यराणी नाशिकला ६.१३ व सीएसटीला १०.०७ ला पोहचते. मात्र तिला येताना-जाताना लासलगाव, निफाड, दादर थांबा दिलेला नाही. राज्यराणी सायंकाळी सीएसटीवरून ६.४५, नाशिकला रात्री १०.१५ व मनमाडला रात्री ११.२५ ला पोहचते. सीएसटीवरून नाशिकला येण्यासाठी दुपारी ३ वाजता सेवाग्राम, ४.३० वाजता नंदीग्राम, ६.१५ ला पंचवटी, ६.४५ ला राज्यराणी, ७ वाजता विदर्भ आहे. मुंबईत व्यापाºयांची कामे ५ वाजेपर्यंत संपून जातात. तर शासकीय कार्यालय सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने पंचवटी व त्यापूर्वी असलेल्या रेल्वेंना येणाºया प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे राज्यराणीला येणारे प्रवासी जास्त शिल्लक राहत नसल्याने प्रतिसाद मिळत नाही. नंदीग्राम व पंचवटी या दोन गाड्यांमध्ये पावणेदोन तासांचा कालावधी असून, यामध्ये सीएसटीवरून राज्यराणी सोडल्यास तिचा खºया अर्थाने प्रवाशांना व पर्यायाने रेल्वेलादेखील फायदा होईल.दादर महत्त्वाचे ठिकाणनाशिकहून मुंबईला जाणारे बहुतांश प्रवासी हे दादरलाच उतरतात. अत्यंत कमी प्रवासी सीएसटीला उतरतात. दादरला उतरल्यावर प्रवाशांना पश्चिम रेल्वेलाइनवरील अंधेरी, बोरिवली, मुंबई सेंट्रल, चर्चगेट व हार्बर लाइनवरील कुर्ला, चेंबूर, वडाळा आदी ठिकाणी जाणे सोपे होते. मात्र राज्यराणीला दादर थांबा नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो.

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकNandedनांदेड