शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

नाशकात पुन्हा पावसाळा, पुन्हा स्वाईन फ्ल्यू डेंग्यू!

By संजय पाठक | Updated: July 13, 2019 23:34 IST

नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालिकेवर आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर रोष, तेच ते इशारे हे सर्व परंपरेने चालत आले आहे. २०१९ हे वर्ष तरी त्याला अपवाद कसे असणार?

ठळक मुद्देरोगांची परंपरा आणि उपचाराचीहीमहापालिकेत बैठकीची केवळ औपचारीकताच

संजय पाठक, नाशिक- सण आणि उत्सव जशी या देशाची आणि समाजाची परंपरा आहे, तशीच नाशिक शहराला एक शहर म्हणून देखील परंपरा आहे. शहरात पावसाळ्या आला की पुन्हा स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यु सारखे जोड साथीचे रोग येतात. त्यातून शेकडोंना लागण काहींचा मृत्यू मग नागरीकांचा महापालिकेवर आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर रोष, तेच ते इशारे हे सर्व परंपरेने चालत आले आहे. २०१९ हे वर्ष तरी त्याला अपवाद कसे असणार?आला पावसाळा, तब्येत सांभाळा असे नेहेमीच सांगितले जाते. पावसाळा नियंत्रणात नाही मात्र रोगराईतर असू शकते. परंतु तसे होत नाही. नाशिक शहरात पावसाळा आला म्हंटला की, लगेचत एक वर्षे स्वाईन फ्ल्यु तर एक वर्ष डेंग्यु अशी वर्षाआड येण्याची परंपरा आहे. डेंग्यू रूग्णांची संख्या ही आत्तापर्यंत मर्यादीत असून अवघे २०-२२ रूग्ण आहेत. परंतु यंदा स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले आहे. गेल्यावर्षी जानेवारीपासून जुलैपर्यंत जेमतेम एक रूग्ण होता. व त्याचा मृत्यू झाला होता. यंदा मात्र जानेवारीपासूनच स्वाईन फ्ल्यूच्या उपसर्गाला सुरूवात झाली. आता जुलैपर्यंत ही संख्या दीडशे पर्यंत पोहोचली असून दहा जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात बळींची हीच संख्या ३५ वर असून राज्यात ती सर्वाधिक अधिक असल्याने यंदा मात्र शासकिय यंत्रणांची धावपळ उडाली. आरोग्य खात्याच्या साथ रोग नियंत्रण अधिकाºयांनी नाशिकमध्ये धाव घेतली. शासकिय वैद्यकिय अधिकारी आणि खासगी वैद्यकिय व्यवसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांना देखील प्रशिक्षण दिले. अर्थातच रोग नियंत्रण हातात नाही, अशी स्पष्ट कबुली देताना मृत्यू कमीत कमी होतील म्हणजेच माणसाचे जीव कसा वाचेल यावर त्यांनी अधिक भर दिला. अर्थात, हे व्यवहार्य म्हणावे लागेल. रोगाचे विषाणु दरवर्षी बदलत जातात त्यामुळे रोगप्रतिबंधात्मक म्काम आव्हानात्मक असते हे खरे असले तरी नाशिकच संवेदनशील का याबाबत देखील विश्लेषण झाले पाहिजे.अर्थात, शासकिय स्तरावर रोगराईसंदर्भात काही तरी गांर्भिय आढळले. नाशिक महापालिकेत मात्र कोणत्याही प्रकारचे गांभिर्य नाही, असे दिसले. महापौरांनी एक बैठक घ्यायची अधिकाºयांना सर्व गटनेत्यांनी घेरायचे आणि मग त्यांचे प्रत्येक दावे चुकीचे ठरवत झाडाझडती घ्यायची ही देखील महापालिकेची परंपराच ठरत आहे. त्यानुसार यंदाही ती यथा सांग पार पडली. पेस्ट कंट्रोल आणि घंटागाडीचे ठेकेदार काय करतात, मग त्यांच्यावर कारवाई काय झाली, त्यांच्यावर कारवाई करीत नसाल तर मग तुमच्यावर कारवाई करू का या सारखे प्रश्न केल्यानंतर अखेरीस महापौरांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश द्यायचे त्यांच्या अंमलबजावणीचे अहवाल मागवायचा, मग बैठक संपली. नंतर आराखडा होत नाही आणि अहवाल देखील दिला जात नाही. रोगराई होऊ नये याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही नाही की उपाययोजना नाही. झाडा झडती हेच उद्दीष्ट! ते साध्य झाले की, काहीही मग प्रशासन नाकर्ते त्यांची अगोदरच झाडाझडती घेतली होती. यंदाही महापालिकेत ही बैठकीची परंपरा पार पडली.अर्थात, सर्व सामान्य कष्टकरी वर्ग वगळला तर सजग वर्ग हा महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर कधीच अवलंबून नसतो. तो केवळ सार्वजनिक स्वच्छतेची अपेक्षा बाळगून असतो. तेवढी झाली तरी खूप असते. परंतु तेही होत नसेल तर तो महापालिका ही पालक संस्था असून त्याकडे नकारात्मक दृष्टीनेच पाहतो. आणि त्यामुळेच महापालिकेला शिव्यांची लाखोलीही वाहतो अर्थात ही देखील ‘परंपराच’!

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लूdengueडेंग्यू