शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

 दिंडोरी तालुक्यात रबीची पिके जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 6:08 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात व इतर भागात अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले; परंतु रबी हंगामातील गहू, हरभरा ही पिके अस्मानी संकटावर मात करीत जोमात आल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मागील हंगामाची नुकसान मालिका रबी हंगामातही सुरू राहिल्याने दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. आता अवकाळी पावसाने रबी हंगाम पूर्णपणे वाया जाईल की काय, या भीतीने शेतकरी वर्ग भयभीत झाला होता; परंतु नशिबाने साथ दिल्याने अवकाळी पावसाचा फटका केवळ अर्ली द्राक्षांना बसला व गहू, हरभरा ही पिके वाचल्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.मागील हंगामात कमी पाऊस झाला; परंतु त्या कमी पावसामुळे नगदी भांडवल देणाऱ्या पिकांचे अतोनात नुकसान केल्यामुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हतबल झाला होता. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज उपलब्ध करून रबी हंगामातील गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली; परंतु अवकाळी पाऊस, वातावरणाचे बदलते रूप, पाणीमिश्रित धुके यामुळे रबीतील पिके वाया जातात की काय, अशी शंका शेतकऱ्यांना वाटत होती. नंतर थोड्याच दिवसांनी थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे ते वातावरण गहू, हरभरा पिकांसाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे यंदा गहू व हरभरा याचे सरासरी उत्पादन वाढण्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती