शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:50 PM

हरीयाणा पोलीसांनी आंतरजातीय विवाह करणा-यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या आवारात शेल्टर होम उभारले आहे. दोन वर्षे तेथे राहता येते. या दरम्यान, ज्यांच्या कुटूंबियांचा विरोध आहे त्यांना बोलवून त्यांची समजूत काढली जातेच शिवाय विवाह करणा-यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार धरू अशी अंतिम ताकीद दिली जाते.

ठळक मुद्देजोडीदाराची विवेकी निवड उपक्रम सुरू शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात

नाशिक-  बीड येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून हत्याकांड घडले. भाग्यश्री वाघमारे या मुलीच्या भावाने म्हणजेच बालाजी लांडगे याने तीच्या पतीची रोहीत वाघामारे याची हत्या केली. आॅनर किलींग किंवा आंतरजातीय विवाह केला म्हणून हत्या करण्याचे प्रकार नवे नाहीत. मात्र त्यावर पायबंद आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या जात पंचायत मूठ माती अभियानाचा विषय हाताळणारे आणि या विषयासाठी राज्यस्तरावर काम करणारे प्रदेश कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली. त्याच बरोबर अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याचा हरीयाणा पॅटर्न उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. प्रश्न: आॅनर किलींग या प्रकाराच्या विरोधात सुरू असलेली मोहिम आणि बीडची घटना याबाबत काय वाटते?चांदगुडे: आंतरजातीय विवाह केल्यानंतर उभयतांच्या कुटूंबियांपैकी कोणाचा विरोध असेल तर त्यातून होणा-या हत्याकांड किंवा सामाजिक बहिष्काराचे प्रकार नवे नाहीत. २०१३ मध्ये अशाच प्रकारे जात पंचायतीमुळे आंतरजातीय विवाह करणा-या मुलीला शिक्षा मिळाली. त्यामुळे महाराष्टÑ अंनिसने या विषयाला हात घातला. त्यामुळे जातीयवाद करणा-या जातीय पंचायतींना चाप बसला. तसेच राज्य सरकारला कायदाही करावा लागला. बीड मधील घटनेचे मुळ कारण अद्याप तपासले जात आहे.प्रश्न: अंनिसने याबाबत काय जागृती केली आहे.चांदगुडे: जात पंचायत मूठमाती अभियान अंनिसने राबविले आणि त्यानंतर सरकारला कायदा करावा लागला हे सर्वांनाच माहिती आहे परंतु त्यापलिकडे जाऊन जोडीदाराची विवेकी निवड उपक्रम सुरू केला आहे. आंतरजातीय विवाह करताना जोडीदाराची किती विवेकाने निवड झाली आहे हे आधी तपासले जाते. मगच त्यांना मदत केली जाते. सुरूवातीला तर मुला मुलींना प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजावला जातो. त्यानंतर मुले परिपक्व नसतील तर त्यांची समजूतही काढली जाते. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही लाभत आहे. प्रश्न: बीड सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय करता येईल?चांदगुडे: आंतरजातीय विवाहातून होणारे जातीतील वाद आणि जात पंंचायतीने त्यावर दिलेले आदेश असे प्रकार यापूर्वी घडले होते. त्यामुळे त्यावर सरकारने कायदा केला आहे. परंतु हरीयाणामध्ये याबाबत वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. हरीयाणा पोलीसांनी आंतरजातीय विवाह करणा-यांसाठी पोलीस मुख्यालयाच्या आवारात शेल्टर होम उभारले आहे. दोन वर्षे तेथे राहता येते. या दरम्यान, ज्यांच्या कुटूंबियांचा विरोध आहे त्यांना बोलवून त्यांची समजूत काढली जातेच शिवाय विवाह करणा-यांच्या जीवाला काही झाल्यास जबाबदार धरू अशी अंतिम ताकीद दिली जाते. शेल्टर होमच्या माध्यमातून प्रश्न सुटतात असे मी बघितले आहे त्यामुळे महाराष्टÑात अशाप्रकारचे शेल्टर होम सुरू झाले पाहिजे. त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला आम्ही दिला आहे त्याच बरोबर सध्या आंतरजातीय विवाह करणा-यांना राज्य सरकार पन्नास हजार रूपये देते त्यात वाढ करून राजस्थान सरकारप्रमाणेच दोन लाख रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची देखील मागणी केली आहे तूर्तास हरीयाणाच्या धर्तीवर शेल्टर होम उभारण्याच्या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत.मुलाखत: संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक