शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

दोन हंगामांचे दुःख बाजूला ठेवून द्राक्ष उत्पादक लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 8:35 PM

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यात हंगामाला सुरुवात : अर्ली द्राक्ष छाटणीचाही प्रयोग

येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे.

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असले तरी पालखेड लाभ क्षेत्राखाली तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतात शेततळे उभारून द्राक्ष बागेची लागवड केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी अर्ली द्राक्ष छाटणीचा प्रयोग गेला असून द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे.

द्राक्षबाग म्हटले की एप्रिल छाटणीपासून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची कामे चालू होतात. छाटणी झाल्यानंतर सपकेन, केन याबरोबरच काडी परिपक्वतेसाठी विविध औषधांच्या मात्रा देऊन साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्षाची छाटणी करतात. पण गेल्या दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता, दोन वर्षांत कधी कोरोनाचे संकट, तर कधी निसर्गाचे संकट, यातून वाचून द्राक्षबाग आली तर व्यापाऱ्यांचे संकट, अशा अनेक संकटांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ग्रासल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे.

सध्या ढगाळ वातावरण व पावसाची काही प्रमाणात रिमझिम सुरू असतानाही शेतकऱ्यांनी द्राक्ष (ॲक्टोबर) छाटणीचा प्रारंभ केला आहे.पुनश्च हरिओमसलग दोन वर्षे कोरोना महामारीमुळे द्राक्ष मातीमोल भावाने विकावा लागली आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. चालू द्राक्ष हंगामात उपलब्ध द्राक्षाची टप्प्याटप्प्याने छाटणी करून उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचा मानस आहे. या वर्षीही द्राक्ष पिकास बाजारभाव व निसर्ग कसा असेल हे आज जरी सांगणे शक्य नसले तरी शेतकरी सगळे विसरून पुनश्च कामाला लागला आहे हे नक्कीच..!खर्चात वाढद्राक्ष पीक दिवसेंदिवस खर्चीक बनत चालले असून औषधे, रासायनिक खते, लिक्विड खते यांच्यात झालेली भरमसाट वाढ तसेच मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने चार पैसे अधिक देऊन कामे करून घ्यावी लागत आहेत.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे द्राक्ष उत्पादक मेटाकुटीस आलेला आहे. दरवर्षाच्या तुलनेत यंदा अर्ली छाटणीस प्रारंभ केला आहे. दोन वर्षांपासून कर्जबाजारी झालेला द्राक्ष उत्पादक नफा-तोटा विसरून पुन्हा नव्याने स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागला आहे. त्या ला हवी आहे फक्त आता निसर्गाची साथ..!- सुदाम सौंदाणे, द्राक्ष उत्पादक, शेवगे 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी