शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पर्यटन करताना हवी सावधगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:03 IST

वर्षा सहलीचा आनंद लुटताना नेमकी काय खबरदारी घ्यावी्य कोणत्या पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात? याबाबत राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्याशी साधलेला संवाद ...

ठळक मुद्देधबधब्यांजवळ जाणे कटाक्षाने टाळावेआपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात द्या

नाशिक : मान्सूनच्या जलधारांचा वर्षाव सर्वदूर होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून वसुंधरेला जणू हिरवा शालूचा साज चढलेला पहावयास मिळणार आहे. पावसाळी वातावरणाची मोहिनी न पडल्यास नवलच ! वर्षा सहलीचा आनंद लुटताना नेमकी काय खबरदारी घ्यावी्य कोणत्या पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात? याबाबत राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्याशी साधलेला संवाद ...

  • वर्षा सहलीचा अनुभव लुटण्यासाठी नेमक्या कोणत्या परिसराची निवड करता येईल ?

- पावसाळा म्हटला की, सर्वदूर निसर्गाचे वेगळेच मनमोहक रूपडे पहावयास मिळते. सर्वत्र हिरवळ, सरींचा वर्षाव, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगावरून कोसळणाऱ्या पांढ-या शुभ्र जलधारा असे वातावरण नाशिक जिल्ह्यात नक्कीच अनुभवता येणार आहे. यासाठी ‘वीकेण्ड ट्रीप’चा बेत आखण्यास हरकत नसावी. गंगापूर धरणापासून तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांमध्ये भटकंतीला प्राधान्य द्यावे. भावली, अंजनेरी, पेगलवाडी-पहिने, वैतरणा, घाटनदेवी, भंडारदरा, कसारा जव्हार, मोखाडा या भागांना भेटी देता येतील.

  • पावसाळी पर्यटन करताना काय खबरदारी घ्यावी?

- पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे, घाटमार्ग, धरण परिसरात बेभानपणे वर्तन अजिबात अपेक्षित नाही. प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगावी. आपल्यामुळे कोणाच्या आनंदावर पाणी फिरणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिउत्साहीपणा प्रत्येकाने टाळायला हवा. सुचनाफलकांच्या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. पर्यटनस्थळांवर स्वच्छता राखावी, मद्यप्राशनासाठी पावसाळी पर्यटनाचा बेत आखणे धोक्याचे ठरेल.

  • आपत्कालीन परिस्थितीत  मदतीचा हात कसाद्यावा?

- पावसाळी पर्यटनाला बाहेर पडताना सोबत पॉवरबॅँक ठेवावी जेणेकरून मोबाईल बंद पडणार नाही. पर्यटन करताना कोठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्यासारख्याच त्या पर्यटकांनाही मदतीचा हात द्यावा. मोबाईल नेटवर्क मिळत नसले तरी आपत्कालीन १००, १०१, १०८ हे क्रमांक डायल होतात. त्यावरून निश्चित स्वरूपाची मदत मिळवावी. नेटवर्क असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अपघातांच्या घटनांकडे दुर्लक्ष करू नये.

  • धबधब्यांचे सोेंदर्य कसे न्याहाळावे?

पावसाळ्यात धबधबे ओसंडून वाहतात. जिल्ह्यांत धबधब्यांची संख्या अधिक आहे. धबधब्यांचे रूपडे लांब अंतरावरून डोळ्यांत साठवावे. धबधब्यांजवळ जाणे कटाक्षाने टाळावे. जेणेकरून दुर्घटना घडणार नाही.

शब्दांकन : अझहर शेख.

 

 

 

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस