शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

लोकवर्गणीतून साकारलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 5:24 PM

सिन्नर : तालुक्यातील दातली येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात श्री विठ्ठल-रूख्मिणी, ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दातली येथील मंदिर जीर्ण झाल्याने लोकवर्गणीतून नव्या मंदिराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. दोन दिवस सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त विठ्ठल-रूख्मिणी, ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे व कलशाचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर मंदिरात होम-हवन, अभिषेक, महापूजा, यज्ञ आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. टाळ-मृदृंगाच्या गजरात सजवलेल्या रथामधून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. रविवार (दि.३१) रोजी सकाळी ९ वाजता विठ्ठल-रूख्मिणी, ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रामायाणाचे गाढे अभ्यासक ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर ९.३० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ढोक यांचे किर्तन पार पडले. कै. नकूबाई आव्हाड यांच्या स्मरणार्थ सुकदेव सावळीराम आव्हाड यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दातली, केदारपूर, शहापूर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक