शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आर्थिक धोरणामुळे कामगार संघटनांची शक्ती खिळखिळी : भालचंद्र कांगो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:17 AM

भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.

नाशिक : भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.जानेवारी महिन्यात होणाऱ्या देशव्यापी संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवावी. कामगारविरोधी व नवीन आर्थिक धोरणांमुळे संघटनांची शक्ती खिळखिळी झाली आहे, असे प्रतिपादन भाकपचे राष्टय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.आयटकच्या वतीने आयोजित दोनदिवसीय १८व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी कांगो बोलत होते. आयटकचे प्रदेशाध्यक्ष सुकुमार दामले हे अध्यक्षस्थानी होते. श्रीकृष्ण लॉन्स येथे होत असलेल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा, महासचिव देवीदास तुळजापूरकर, श्यामजी काळे, राजू देसले आदी उपस्थित होते.यावेळी कांगो म्हणाले, बेरोजगारी, असंघटित कामगारांचे प्रश्न, किमान वेतनाच्या प्रश्नासह विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत; मात्र या सरकारला या समस्यांशी देणे-घेणे नाही. सरकार केवळ सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेण्यात मग्न आहे.कायदा-सुव्यवस्था व संविधानाने दिलेले अधिकार हे धोक्यात आले आहे. देशातील सर्व कायदे बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने चालविला आहे.  जानेवारीमध्ये पुकारण्यात आलेला संप हा संविधान वाचविण्यासाठीदेखील असणार आहे. कामगार संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे महाराष्टला दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. अधिवेशनामध्ये ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदबाबत नियोजन, कामगारविरोधी संकटांवर मात करण्यासाठी चर्चा, सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर विचारमंथन करण्यात येत आहे. दुपारच्या सत्रात कृषी अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी शेतकरी कामगारांच्या चळवळीची एकजूट ही काळाची गरज या विषयावर मत मांडले.

टॅग्स :Employeeकर्मचारीNashikनाशिक