शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

लेखणीत सत्ता उलथविण्याची ताकद : बी. जी. वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:06 AM

लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे.

नाशिक : लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणूनच जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक, विचारवंतांची भीती वाटत आली आहे. अशा अमूल्य विचारांचा ठेवा असलेल्या पुस्तक ांच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होणे शक्य असून, विचारातील बदल घडविण्याचे सामर्थ्य केवळ पुस्तकात असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले.सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे आयोजित जागतिक पुस्तक दिन व दिवंगत रामचंद्र काकड यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘वाचन संस्कृती’ विषयावर बी. जी. वाघ यांनी व्याख्यान दिले. ते म्हणाले, लेखकांनी पुस्तकांच्या माध्यमातून खूप मोठे वैचारिक धन समाजाला दिले आहे.कारण सत्ताधाऱ्यांना विचारवंत लेखकांची नेहमीच भीती राहिली असून, लेखनीत सत्ता उलथवून टाकण्याची शक्ती असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जगातील सर्वात मोठी फ्रेंच राज्यक्रांती लेखकांच्या आणि विचारवंतांच्या लेखनीचेच फलित असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. दरम्यान, वाचक प्रतिनिधींसह वाचनालयाच्या कर्मचाºयांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या वाचनालयाच्या सभासदांना यावेळी काही पुस्तक ांचे मोफत वाटप करण्यात आले.याप्रसंगी सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सहसचिव अभिजित बगदे, शंकरराव बर्वे, उदयकुमार मुंगी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोºहाडे, तर आभार विवेक उगलमुगले यांनी मानले.

टॅग्स :world book dayजागतिक पुस्तक दिनNashikनाशिक