शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

विकासाभोवती फिरणार राजकारण

By admin | Updated: January 5, 2017 01:16 IST

नामपूर गट : इच्छुकांकडून व्यूहरचना सुरू, गट आरक्षित झाल्याने अनेकांचे स्वप्न भंगले

शरद नेरकर नामपूर
नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला आणि धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या नामपूर गटात गेल्या पंचवार्षिकप्रमाणेच याही वेळेस सर्व पक्षांकडून इच्छुकांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी मिळेल तेव्हा मिळेल, पण अनेकांनी निवडणुकीची व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. गटात समस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने विकासाच्या प्रश्नाभोवतीच यावेळच्या निवडणुकीची चक्रे फिरतील असे सध्याचे चित्र आहे.
बागलाण तालुका हा गेल्या अनेक पंचवार्षिकपासून राखीव आहे, तर जिल्हा परिषदेचा गट हा यापूर्वी जनरल होता. आता पुन्हा तो राखीव (पुरुष) झाला आहे. यात नामपूर जिल्हा परिषद गटात स्व. जयवंतराव सावंत, स्व. बाळासाहेब कापडणीस व नारायणमामा कोर हे किंगमेकरच्या भूमिकेत असत. नामपूर जिल्हा परिषद गट हा तसा ३० हजार मतदारांचा मतदारसंघ. नामपूर जिल्हा परिषद गटात अनेक खादीधारी नेतेमंडळी आहेत. मात्र आरक्षण सोडतीत हा गट आदिवासी पुरुष आरक्षित झाल्याने मिनी मंत्रालय बघण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच अनेकांकडून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त होत आहे. उमेदवारांच्या वागणुकीत बदल जाणवत असून, ‘होम टू होम’ गाठीभेटी घेताना दिसत आहेत. ‘काय हवं, काय नको’ याचीही काळजी घेतली जात असल्याची चर्चा मतदारांत होताना दिसत आहे.
या गट-गणात यापूर्वी अनेक उमेदवार निवडून गेलेत; मात्र समस्या काही संपत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता, वीज, पाणी, घरकुले या अत्यावश्यक गरजा आजही प्रलंबित आहेत. मागील वेळी सर्वच उमेदवारांनी भरभरून आश्वासने दिली, पण समस्या आजही ‘जैसे थे’च आहेत.
या गटात मराठा कार्ड महत्त्वाचे मानले जाते. मराठा नेतृत्व व हा समाज निवडणुकीचा कल सहज फिरवू शकतो हा आजवरचा इतिहास आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत जनरल गटात कै. रमेशभाऊ कुलकर्णी या ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराव्यतिरिक्त एकही इतर समाजाचा उमेदवार निवडून आलेला नाही. अशोकराव सावंत, प्रा. गुलाबराव कापडणीस, सुनीता पाटील या मराठा समाजाच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. अल्पसंख्याक समाजाव्यतिरिक्त या गटात भिल्ल समाजाचे मतदानही तेवढेच निर्णायक असते. गटात भिल्ल समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणावर असून, हा समाज ज्या उमेदवाराचे समर्थन करेल तो उमेदवार विजयापर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असते. दिलीप मंगळू बोरसे, उमाजी बोरसे, सोमनाथ सोनवणे व कन्हुराज गायकवाड ही या समाजाची मातब्बर मंडळी. यांचे समर्थन मिळविण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करतात, तर जिजाबाई सोनवणे यांनीही काही वर्षे सभापतिपद भूषविले आहे. आजही त्या सभापती आहेत. भिल्ल समाजाचे लक्ष्मण तोताराम पवार हे एकलव्य संघटनेचे आमदार होते. थोडक्यात, भिल्ल समाजही या गटात निर्णायक आहे. वाणी, मारवाडी, ब्राह्मण, माळी, तेली व मुसलमान या समाजाच्या मंडळींची मतेसुद्धा नजरेआड करता येणार नाहीत.
या गटात मुस्लीम समाजाचे मतदार कमी आहेत. हा गट तसा काँग्रेसचा आहे. मात्र गेल्या दशकापासून भाजपाचे काम येथे वाढताना दिसत आहे. हिंदुत्वाचा पगडा या मतदारसंघावर आहे. शेतकरी संघटनेचेही अनेक कार्यकर्ते येथे आहेत. भाजपाला येथून आमदारकीही मिळाली आहे. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांच्या विचारसरणीचा बागलाणात आजही प्रभाव दिसून येतो. अंबासन हे त्यापैकी एक गाव. म्हणूनच शेतकरी संघटनेचे दिलीप मंगळू बोरसे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. थोडक्यात, शेतकरी संघटनेलासुद्धा एक आमदार बागलाणने दिला असून, त्यात नामपूर गट व अंबासन गणाचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, मनसे, शेतकरी संघटना यांचे उमेदवार निवडणूक लढवितात. येथे पक्ष म्हणून निम्मा विजय सोपा होतो, तर मनसेचे सतीश विसपुते, स्व. अंबादास अहिरे (रातीर) ही मंडळी गणात आपापल्या कर्तृत्वाने स्वबळावर निवडून येतात. थोडक्यात, हा गट व गण पक्षाबरोबरच व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाचा विचार करणारा आहे.