शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पुनद योजनेविरोधातील याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 4:54 PM

उच्च न्यायालय : सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश

ठळक मुद्देपुनद पाणी पुरवठा योजनेचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ जूनला पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले

नाशिक : जिल्ह्यातील सटाणा शहराच्या पुनद पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. पुनद पाणी पुरवठा योजनेचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेशही न्यायालयाने प्रशासनाला दिल्याने सटाणा शहर वासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.पुनद पाणी पुरवठा योजनेचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २८ जूनला पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले. दैनंदिन कामकाजाचा आढावा १५ जुलैला न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेश दिल्यानंतर कळवण तालुक्यातील शेतकरी संदीप सुधाकर वाघ यांनी पुनद पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर १५ जुलैला सुनावणी होवून संदीप वाघ यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत पुनद पाणी पुरवठा योजनेवर कोणीही अर्ज करू शकत नसल्याचे स्पष्ट केले .पुनद पाणी पुरवठा योजनेसंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने सहा महिन्यात योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पुनद पाणी पुरवठा योजना ही तांत्रिक मंजुरी घेवूनच शासनाने सुरु केलेली असल्याने ही योजना चुकीचे आहे, असे म्हणताच येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.धरणातील पाणी ही कोणाची खाजगी मालमत्ता नसून गरजेनुसार कोणालाही पाणी देता येवू शकते असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण