शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

मुंबई, पुण्याहून आलेल्यांचा शहरात वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:07 PM

नाशिक : कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेल्या पुणे, मुंबई येथील अनेक नागरिक नाशिकमध्ये शिरले असून, शहरातील आपल्या नातेवाइकांकडे त्यांचे खुलेआम वास्तव्य आहे. शहरातही त्यांचा वावर वाढला असताना अशा घुसखोरांना रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही.

नाशिक : कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेल्या पुणे, मुंबई येथील अनेक नागरिक नाशिकमध्ये शिरले असून, शहरातील आपल्या नातेवाइकांकडे त्यांचे खुलेआम वास्तव्य आहे. शहरातही त्यांचा वावर वाढला असताना अशा घुसखोरांना रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलीस प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. नागरिकांच्या तक्रारीनंतर आरोग्य कर्मचारी येऊन माहिती घेऊन जातात, परंतु त्यांची आरोग्य तपासणी करीत नसल्याने पालिकेचा आरोग्य विभाग केवळ सोपस्कार पूर्ण करीत असल्याचे दिसून येते.पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले असल्याने या दोन्ही शहरांतील नागरिकांवर अनेक निर्बंध आहेत. असे असतानाही प्रशासनाला खोटी माहिती देऊन पुणे-मुंबईतील लोक नाशिकमध्ये शिरकावर करीत आहेत. गेल्या दोन दिवसांत तर पुणे, मुंबईच्या अनेक गाड्या नाशिकच्या रस्त्यावर दिसून आल्या. नाशिकमध्ये शिरलेल्या या नागरिकांची जागरूक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेचे पथक चार ते पाच तासांनी दाखल होते. त्यानंतर संबंधितांनी दिलेली माहिती खरी आहे असे समजून घेत नर्सेस निघून जातात. मात्र त्यानंतर संबंधितांची पथकाकडून कोणतीही चौकशी केली जात नसल्याने असे लोक नाशिककरांच्या संपर्कात येत आहेत. संबंधितांना घराबाहेर न पडण्याची ताकीद देऊनही विनामास्क असे लोक इमारतीमध्ये वावरत असल्याने स्थानिक नागरिकांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. पथक येऊन गेल्यानंतरही संबंधितांकडे आलेली व्यक्ती सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेत नसल्याचे आरोग्य विभागाला कळविल्यानंतर ते पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देत आहेत.संपूर्ण नाशिक जिल्हा कोरोनाशी लढा देत असताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ज्या यंत्रणांकडे जबाबदारी आहे त्यांच्याकडून मात्र याप्रकरणाचे फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचा अनुभव येत आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर तेथील कर्मचारी नकारात्मक मानसिकतेने असे लोक येणारच म्हणून कार्यवाही करण्याचे टाळत असल्याचा अनुभव तक्रारकर्त्यांना आला आहे. वैद्यकीय पथकही केवळ माहितीचे अर्ज भरून घेऊन निघून जातात, परंतु नंतर संबंधित व्यक्ती कुठे फिरत आहे, घरातच आहे का? याची कोणतीही खबरदारी घेत नसल्याने यंत्रणेकडून मिळणाऱ्या शिथिलतेने नाशिककर मात्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.-------------------------गांभीर्य नसल्याने भीतीकोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी असणाºया यंत्रणांकडून आता फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. इमारतीमध्ये येणाºया पुणे-मुंबईच्या नागरिकांची तपासणी होत नाहीच शिवाय त्यांच्या हातावरील शिक्के पुसले जात आहे. आरोग्य यंत्रणेच्या दप्तरी शिक्केमारल्याचे असले तरी प्रत्यक्षात मात्र संबंधित शिक्के पुसून शहरात वावरत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक