शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

बॅग ‘कॅरी’ करणाऱ्यांना साडेतीन लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:42 IST

नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक : नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेतून साडेतीनशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.शासनाच्या या निर्णयामुळे अनेक व्यापारी, विक्रेत्यांचे हाल झाले. कपडे, बॅग आणि अन्य साहित्य प्लॅस्टिकच्या आवरणातून काढावे लागल्याने हा माल खराब झाला. तर दुसरीकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्लॅस्टिक बंदीविरुद्ध महापालिकेने कारवाई सुरू केल्याने व्यापाºयांनी दीड तास लिलाव बंद ठेवले. नाशिकच्या बाजार समितीतून मुंबई येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठविण्यात येतो. त्यामुळे माल पाठवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस खोक्यांमध्ये भाज्या पाठविण्यात आल्या.  राज्य शासनाने प्लॅस्टिकबंदी केल्यानंतर त्यात प्लॅस्टिक व्यापाºयांवर कारवाई न करता अन्य व्यापारी आणि दुकानदारांवर ती करण्यात आली होती; मात्र शनिवारपासून (दि. २३) महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकारामुळे नाशिकच्या बाजारपेठेत संभ्रम आणि कारवाईचे सावट होते. कापड दुकान, बॅगा आणि तत्सम साहित्य धुळीपासून वाचविण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवण्यात येतात; परंतु त्यांना प्लॅस्टिकचे आवरण काढून ठेवावे लागले, त्यामुळे अनेकांच्या वस्तूंवर धूळ बसली तर रस्त्यावर माल विकणाºयांची पावसामुळे अडचण झाली.दिवसभर बाजारात कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरता येईल याविषयी खल सुरू होता. अनेकांनी जुन्या कापडी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. अशा स्थितीत महापालिकेने कारवाईचा दणका सुरू केला आणि चौथा शनिवार हा सुटीचा दिवस असतानादेखील कारवाई करण्यात आली. महापालिकेने सहा विभागात सहा पथके कारवाईसाठी नियुक्त केली होती. बाजारपेठा, व्यावसायिक संकुले अशा विविध भागात कर्मचाºयांनी कारवाईचा धडाका लावला.नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावापूर्व विभागात १४ वापरकर्त्यांकडून ७० हजार रुपये, पश्चिम विभागात १५ जणांकडून ७५ हजार, नाशिकरोड विभागात १२ जणांकडून ६० हजार, पंचवटी विभागातून १६ जणांकडून ८० हजार, सातपूर विभागात पाच जणांकडून २५ हजार, सिडको विभागात १० जणांकडून ५० हजार याप्रमाणे ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपये असा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय प्लॅस्टिकबंदीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी