शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

ऐन पावसाळ्यात नाशिकरोडला अवघे एक वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:33 IST

नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी पडत असल्याने नाशिकरोड एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात पडसाद उमटताच दोन दिवसात पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत संतापदोन दिवसात तातडीची बैठक

नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी पडत असल्याने नाशिकरोड एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात पडसाद उमटताच दोन दिवसात पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

स्थायी समितीची बैठक सोमवारी (दि.१७) सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी आॅनलाईन बैठकीत याविषयावर जोरदार चर्चा झाली. नाशिकरोड विभागाला चेहेडी बंधाºयातून दारणा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. परंतु देवळाली कॅम्प परिसरातील मलयुक्त पाणी चेहेडीत जाते आणि दुषित जंतुयूक्त पाण्यामुळे चेहेडी पंपींग स्टेशनला शुध्दीकरणात अडचणी येतात आणि नाशिकरोड परीसरात दुषीत पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे उन्ह्याळ्यात चेहेडी बंधाºयाची पातळी कमी झाली की, दारणेऐवजी गंगापूर धरणातून नाशिकरोड विभागाला पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी दोन महिने कालावधीत ही समस्या उदभवते. यंदा अपेक्षीत पावसाळा सुरू झालेला नसल्याने अद्यापही गंगापूर धरणातूनच नाशिकरोड भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, सध्या एकवेळ आणि तेही दुषीत पाणी पुरवले जात असल्याने प्रा. शरद मोरे आणि राहूल दिवे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.

पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलसंपदा विभागाला सहा महिन्यांपूर्वीच पत्र देऊन उन्हाळ्याच्या अखेरीस आधी वालदेवीचे पाणी येऊन गेल्यानंतर दारणाचे आवर्तन सोडा अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिली. त्याच बरोबर गंगापूर धरणातून पाणी घेताना ते सध्या अपुरे पडत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. सभापती गणेश गिते यांनी यासंदर्भात दोन दिवसात नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याची सूचना केली.

दरम्यान, चेहेडी बंधाºयात ज्या ठिकाणी वालदेवी नदीचे पाणी येते, त्याच्या वरील बाजूने दारणा नदीत जलवाहिनी टाकून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव आहे. मनपाने पाणी पुरवठा विभागाने या जलवाहिनीसह अन्य पाणी योजनांचा एकुण २२७ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र तो प्रलंबीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प