शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ऐन पावसाळ्यात नाशिकरोडला अवघे एक वेळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:33 IST

नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी पडत असल्याने नाशिकरोड एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात पडसाद उमटताच दोन दिवसात पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत संतापदोन दिवसात तातडीची बैठक

नाशिक- चेहेडी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर दरवर्षी प्रमाणेच यंदाही गाळ आणि जंतुयुक्ती पाणी पुरवठा सुरू होताच महापालिकेने येथील पाणी उपसा थांबवला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गंगापूर धरणातून पाणी घेतले जात असले तरी सुमारे सात एमएलडी इतके पाणी कमी पडत असल्याने नाशिकरोड एकच वेळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात पडसाद उमटताच दोन दिवसात पाणी पुरवठ्यासंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

स्थायी समितीची बैठक सोमवारी (दि.१७) सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी आॅनलाईन बैठकीत याविषयावर जोरदार चर्चा झाली. नाशिकरोड विभागाला चेहेडी बंधाºयातून दारणा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. परंतु देवळाली कॅम्प परिसरातील मलयुक्त पाणी चेहेडीत जाते आणि दुषित जंतुयूक्त पाण्यामुळे चेहेडी पंपींग स्टेशनला शुध्दीकरणात अडचणी येतात आणि नाशिकरोड परीसरात दुषीत पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे उन्ह्याळ्यात चेहेडी बंधाºयाची पातळी कमी झाली की, दारणेऐवजी गंगापूर धरणातून नाशिकरोड विभागाला पाणी पुरवठा केला जातो. दरवर्षी दोन महिने कालावधीत ही समस्या उदभवते. यंदा अपेक्षीत पावसाळा सुरू झालेला नसल्याने अद्यापही गंगापूर धरणातूनच नाशिकरोड भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, सध्या एकवेळ आणि तेही दुषीत पाणी पुरवले जात असल्याने प्रा. शरद मोरे आणि राहूल दिवे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.

पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलसंपदा विभागाला सहा महिन्यांपूर्वीच पत्र देऊन उन्हाळ्याच्या अखेरीस आधी वालदेवीचे पाणी येऊन गेल्यानंतर दारणाचे आवर्तन सोडा अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, जलसंपदा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिली. त्याच बरोबर गंगापूर धरणातून पाणी घेताना ते सध्या अपुरे पडत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. सभापती गणेश गिते यांनी यासंदर्भात दोन दिवसात नगरसेवकांसमवेत बैठक घेण्याची सूचना केली.

दरम्यान, चेहेडी बंधाºयात ज्या ठिकाणी वालदेवी नदीचे पाणी येते, त्याच्या वरील बाजूने दारणा नदीत जलवाहिनी टाकून पाणी उपसा करण्याचा प्रस्ताव आहे. मनपाने पाणी पुरवठा विभागाने या जलवाहिनीसह अन्य पाणी योजनांचा एकुण २२७ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र तो प्रलंबीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प