शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

कांदा उत्पादकांना ‘अच्छे दिन’

By किरण अग्रवाल | Updated: June 24, 2018 01:13 IST

आवक कमी झाली की बाजारभाव वधारतो व आवक वाढली की भाव पडतो या बाजारपेठेच्या आर्थिक नियमांमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी फायदा तर कधी मोठे नुकसान सोसावे लागले आहे. परंतु गेल्या सप्ताहात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला तब्बल १३०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने साहजिकच गेल्या दोन महिन्यांपासून ४०० ते ५०० रुपये दर स्वीकारून कांदाविक्री करणाºया शेतक-यांना तूर्त ‘अच्छे दिन’ दिसू लागले आहेत.

ठळक मुद्देसरकारला पिकविणा-यापेक्षा खाणा-यांचीच अधिक चिंंता मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातला फटका बसलाअवकाळी पावसाने शेतक-यांवर दया दाखविली

यंदा महाराष्टत जसे उन्हाळ कांद्याचे अमाप पीक आले, तसेच लगतच्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्येदेखील कांद्याच्या पिकाने शेतक-यांच्या आशा पल्लवित केल्या. परंतु लहरी हवामान व बेभरवशाच्या निसर्गाचा यंदा मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातला फटका बसला. मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये यंदा एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट आल्याने तेथील शेतक-यांनी फेब्रुवारी, मार्चमध्ये घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. परिणामी दरवर्षी महाराष्टच्या उन्हाळ कांद्यासोबत बाजारात ‘भाव’ खाणारा परराज्यातील कांदा यंदा बाहेर पडलाच नाही. त्यामुळे देशासह परदेशाची कांद्याची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्टवर येऊन पडली. सुदैवाने यंदा निसर्गाने महाराष्टवर कृपा केली. उष्णतेची लाट काही प्रमाणात असली तरी, अवकाळी पावसाने शेतक-यांवर दया दाखविली. त्यामुळे दरवर्षी मार्च, एप्रिलमध्ये निसर्गाच्या लहरीपणाच्या फटक्यापासून बचावलेल्या कांदा उत्पादकांना त्याचा फायदा झाला. विशेषकरून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला वाढलेली मागणी पाहता, बाजारात क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. जानेवारी, फेब्रुवारीत लागवड केलेला कांदा बाजारात येण्याच्या वेळीच मागणी वाढल्यामुळे शेतक-यांनी थेट खळ्यावरचा कांदा बाजार समितीत आणला. गेल्या आठवड्यापासून दररोज किमान अडीच ते तीन लाख क्विंटलची आवक बाजार समित्यांमध्ये होऊ लागली असून, तूर्त आणखी महिने-दोन महिने शेतकºयांना याचा लाभ होऊ शकतो. परंतु बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे पाहून त्याचा फायदा उचलण्याची तत्परता व व्यावहारिक ज्ञान बाळगून असलेल्या शेतक-यांनी अशा वेळी त्याचा फायदा न उचलला तर नवलच. मात्र शेतक-यांचा हाच आततायीपणा त्यांच्या नुकसानीला पूरक ठरू शकतो. चाळीत साठवून ठेवलेला सर्वच कांदा चांगल्या बाजारभावाच्या आमिषाने लिलावासाठी आणला तर बाजार व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे आवक वाढली की भाव पडतात याचा अनुभव येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कांद्याला सध्या मिळणारा भाव टिकवून ठेवण्याची जबाबदारी व्यापा-यांवर नव्हे तर कांदा उत्पादकांवर असून, त्यामुळे की काय बाजार समित्यांनी उत्पादकांना कमी प्रमाणात कांदा लिलावासाठी आणण्याचे आवाहन केले आहे. तसे झाल्यास येणा-या काही काळासाठी कांदा निश्चित ‘भाव’ खाईल यात दुमत नाही. परंतु सरकारला कांद्याचे ‘भाव’ खाणे कितपत मानवेल हे सांगता येत नाही. कारण सरकारला पिकविणा-यापेक्षा खाणा-यांचीच अधिक चिंंता असते हा आजवरचा अनुभव आहे.

टॅग्स :onionकांदा