शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

मुंबईपासून ‘ओखी’ ६७० कि.मीवर : नाशिकच्या किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर; ‘ओखी’ वादळाचा परिणाम

By azhar.sheikh | Published: December 04, 2017 2:37 PM

पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटरओखी वादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे निरिक्षण पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान

नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे वेगाने वाढत असल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे; मात्र ढगाळ हवामान झाल्यामुळे दिनकराचे दर्शनही याबरोबर दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशापर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर पोहचला आहे. मागील दोन दिवसांमध्ये सहा अंशाने ही वाढ झाल्याचे निरिक्षण हवामान खात्याच्या निरिक्षण केंद्राने नोंदविले. ओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर असून वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे म्हणणे आहे. यामुळे पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

गेल्या वर्षी मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती. काही दिवसांपुर्वी सातत्याने घसरत असलेला किमान तपमानाचा पारा लक्षात घेता डिसेंबरचा पहिला आठवडा हा क डाक्याच्या थंडीचा असू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता; मात्र अचाकपणे लहरी निसर्गाने आपले रुप बदलले असून दोन दिवसांपासून कमालीचे ढग दाटत असल्याने हवामानात आर्द्रता वाढू लागल्याने किमान तपमानात वाढ होत आहे.

भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ वादळाचे थैमानाने ३५ बळी घेतले आहेत. ताशी १३० कि. मी वेगाने हे वादळ लक्षद्वीपवर आदळले. तामिळनाडू, केरळ या राज्यांना ‘ओखी’ ने जबर तडाखा दिला असून पुढे हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळGujaratगुजरातMumbaiमुंबईRainपाऊसNashikनाशिक