शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

तेल्या रोगामुळे सात एकर डाळिंब बाग तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 12:54 AM

मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.

ठळक मुद्दे२५०० झाडे नष्ट : औषध फवारणीचा खर्च वाया, शेतकरी हवालदिल

ब्राह्मणगाव : मर व तेल्या रोगामुळे कंटाळून येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांचे सात एकर क्षेत्रातील २५०० डाळिंबाचे झाडे मुळासकट काढून टाकली. दर वर्षभर डाळिंब बाग जिवंत ठेवण्यासाठी अनेक महागडी औषधे फवारणी करूनही रोग या परिसरात आटोक्यात येत नसल्याने परिसरातील डाळिंब बागा संपुष्टात येण्याच्या स्थितीत आहेत.

गेल्या तीन चार महिन्यांपूर्वीच डाळिंब बागेवर तेल्या, मर रोगाने आघात केल्याने तसेच गेल्या चार-पाच वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, व अन्य नैसर्गिक संकटांना शेतकरी वर्ग कंटाळला आहे. सततच्या या आपत्तींना कंटाळून येथील डाळिंब उत्पादक व तंटा मुक्ती समिती अध्यक्ष ज्ञानदेव दोधू अहिरे यांनी डाळिंबाची बाग, तर मविप्र शिक्षण संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांची शेतातील डाळिंब बाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट काढून टाकली. नैसर्गिक आपत्तीबरोबर सततच्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब फळ पिकावर मोठी अवकळा आली असून, त्यामुळे बऱ्याच द्राक्ष व डाळिंब बाग कुऱ्हाडीने बुडा सकट तोडून टाकल्या जात आहेत. यामुळे परिसरातील डाळिंब, द्राक्षबागांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागल्या असून, शेतकरी निसर्गापुढे हतबल झाला आहे. खरे पाहता फळबागांविनाच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली होती.

------------------------

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

गेल्या चार-पाच वर्षांपासून शेती व्यवसायावर नैसर्गिक संकटांना शेतकऱ्यांना सारखे तोंड द्यावे लागत आहे. तरीही शेतकरी मोठी आर्थिक झळ सोसत शेती व्यवसाय करत आहे. मात्र सध्या अचानक येणारे ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, अती ऊन, त्यातच पिकांवरील महागडी औषधे, वाढती शेतमजुरी, पिकांना उत्पन्नापेक्षा मिळणारा भाव, यात होणारे सर्व नुकसान याला कंटाळून या आधी ये थिल डाळिंब उत्पादक रमेश अहिरे, चंद्रकांत अहिरे, योगेश अहिरे यांनीही डाळिंब बाग व द्राक्षबाग जेसीबीच्या साहाय्याने बुडा सकट तोडून टाकल्या आहेत. त्यातच पुन्हा डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशीनाथ शिरोडे यांनी त्यांची सात एकर क्षेत्रातील डाळिंब बाग तोडली असल्याने गावातील डाळिंब बागांचे क्षेत्र संपुष्टात येण्याचे स्थितीत आहे.

-----------------------

 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती