शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

प्रस्तावच विलंबित !

By किरण अग्रवाल | Published: January 12, 2019 11:00 PM

विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाबदार धरून काय कारवाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.

ठळक मुद्देउपलब्ध निधी खर्ची कसा पडेल, याची चिंता संबंधिताना लागून राहिली आहे.योजनेसाठीची तरतूद कमी व बजेट अधिक, असेही घडून येते. त्यामुळे फायलींचाच प्रवास या टेबलावरून त्या टेबलावर सुरू राहतो.मार्चअखेरीस घाईघाईत वर्कआॅर्डर काढल्या जातील तर कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होईल.

विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाबदार धरून काय कारवाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.शासनाच्या विविध योजनांतर्गत खर्चासाठी मंजूर निधीमधील सुमारे ७० टक्के रक्कम डिसेंबरअखेर उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात कामांवर होणारा खर्च व त्यासंदर्भातील प्रशासकीय मान्यतांचे प्रमाण खूप कमी असल्याने हा उपलब्ध निधी खर्ची कसा पडेल, याची चिंता संबंधिताना लागून राहिली आहे. अर्थात, लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने त्यानंतर नवीन कामांना मंजुरी मिळू शकणार नाही, असे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. अजूनही काही विभाग असे आहेत ज्यांनी प्रस्तावच पाठविलेले नाहीत, त्यामुळे ही भीती खरीच ठरण्याची चिन्हे आहेत. तेव्हा प्रस्ताव न पाठवून हाताची घडी घालून बसलेल्या स्वस्थाधिकाऱ्यांवर कुणी काही कारवाई करणार की नाही? जनता विकासासाठी आसुसलेली आहे, शासनानेही त्याकरिता योजना आखून निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु त्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे प्रस्ताव तयार करून ते वेळेत पाठविले जात नसतील तर संबंधितांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्या हाताची घडी सोडविणे गरजेचे आहे. अनेक प्रस्ताव येतात तर त्यात अपूर्णता असते. योजनेसाठीची तरतूद कमी व बजेट अधिक, असेही घडून येते. त्यामुळे फायलींचाच प्रवास या टेबलावरून त्या टेबलावर सुरू राहतो. यातील दोषी हेरले जावयास हवे. कारण, आता मार्चअखेरीस घाईघाईत वर्कआॅर्डर काढल्या जातील तर कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होईल. अलीकडेच नियोजन समितीच्या एका कारकुनानेच खासदाराच्या नावाने प्रस्ताव करून मंजुºयाही घेऊन ठेवल्याचे आढळून आले होते, तशा प्रकारांना संधी मिळू नये म्हणून प्रस्तावांच्या पातळीवरील विलंब टाळला जाणे हाच यावरील उपाय ठरेल. त्याकरिता त्या त्या विभागांतर्गत जबाबदारीची निश्चिती होणे गरजेचे आहे. अन्यथा, दरवर्षाचे हेच आणि असेच घडून येण्याचे चक्र भेदता येणार नाही. 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद