शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर, नांदगावला वाढली टॅँकर्सची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:18 IST

उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत.

नाशिक : उन्हाची तीव्रता वाढत आहे तशी पाण्याची टंचाईदेखील जाणवत असल्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत पाणी नियोजनावर भर देण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या टॅँकर्सच्या संख्येत वाढ झाली असून, सिन्नर आणि नांदगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टॅँकर्सची संख्या झाली आहे. जिल्ह्णात २६८ टॅँकरद्वारे गाव आणि वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.कमी पर्जन्यमानामुळे यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, पाणी टॅँकर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्णात २० टॅँकर्सची संख्या वाढली असून, सिन्नर आणि नांदगावमध्ये सर्वाधिक ५१ टॅँकर्स सुरू आहेत. त्याबरोबरच मालेगाव आणि येवला, बागलाण, चांदवड या तालुक्यांमध्ये टॅँकर्सची मागणी वाढली आहे. आणखी काही तालुक्यांमधून टॅँकर्सच्या मागणीची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाभरात पाणीपुरवठा करणाऱ्या २१८ टॅँकर्सची संख्या आता २३८ वर पोहचली आहे. टॅँकरची ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.गेल्या १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात २१८ टॅँकर्सद्वारे गाव आणि वाड्यांना ८४० ठिकाणी पाणीपुरवठा केला जात होता. आताही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याच्या टॅँकरची मागणी गावागावातून होऊ लागली आहे. जिल्हाभरातून आलेल्या मागणीनुसार गेल्या आठवड्यात २० टॅँकर्स वाढविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेली टॅँकर्सची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून मागणी केलेल्या गावांना तत्काळ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशीदेखील मागणी नोंदविण्यात आलेली आहे. पाण्याची समस्या वाढत असताना ज्या गावांना पारंपरिक जलस्रोताच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता यातील काही स्रोतांनी तळ गाठायला सुरुवात केल्याने या गावांचा प्रश्न निर्माण होणार आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्णाची भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.अतिसाराची भीती अधिकज्या गावांचा जलस्रोत आटला आहे आणि अशाही परिस्थितीत तेथून पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे अशा गावांमध्ये अतिसाराची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा जलस्रोतावरचे पाणी पिण्यायोग्य झाल्याशिवाय वापरू नयेत, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. आटलेल्या जलस्रोतांबरोबरच आता अन्य जलस्रोत शोधण्याच्या कामालादेखील सुरुवात झाली आहे.च्दिवसेंदिवस पर्जन्यमानाचे खालावत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे जाणवणारा तीव्र उन्हाळा यामुळे जिल्ह्णातील दुष्काळी परिस्थिती भीषण होत आहे. जिल्ह्णातील विविध तालुक्यांमध्ये भूजल पातळीने नीचांकी गाठली आहे. सिन्नर, सटाणा, मालेगाव, कळवण यांसारख्या तालुक्यांमधील भूजल पातळी कमी झाली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी