शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

केटीएचएम महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:52 IST

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, ...

ठळक मुद्देचर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांची नोंदणी

नाशिक : कोट्यवधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मूठभर लोकांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता, लिंगभेद, विकास निर्देशांक, यांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली असून, सामाजिक सौररचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रुती तांबे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व केटीएचएम महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आयोजित दोन दिवसीय ‘रिथनिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिस्प्लेसमेंट आॅफ इंडिया’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर माजी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. बी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय सावळे उपस्थित होते.डॉ. तांबे म्हणाल्या की, समाजशास्त्र विकासाचा अभ्यास पुरेशा गांभीर्याने केला का? असे विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. आर. बी. पाटील म्हणाले, भारतामध्ये प्रामुख्याने खाणी, खासगी उद्योग, अभयारण्ये, धरणे यामुळे विस्थापितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम आदिवासींवर याचा परिणाम आदिवासींवर होतो. पुनर्वसनासंदर्भात कायदे असून, त्याचा योग्य तो वापर होत नाही त्यामुळे पुनर्वसित नागरिकांना सुविधा मिळत नाही वारणा व कोयना धरण हे याबाबतचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.दिल्ली विद्यापीठ समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदिनी सुंदर यांनी नैसर्गिक आपत्तीमध्ये विस्थापित होणाऱ्यांमध्ये गरीब मोठ्या प्रमाणावर असतात. विस्थापित झाल्यावर सामाजिक संरचना बदलते त्यामुळे असमानता निर्माण होते. नाते-संबंधामध्ये दरी निर्माण होत. लोकांमध्ये एकतेची भावना राहत नाही; याचा परिणाम समाज संरचनेवर होतो, असे त्यांनी सांगितले.सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर समृद्धी महामार्ग या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होणार आहेत. याला तुम्ही विकास म्हणू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून लोकांनी संघटित होऊन याला विरोध करणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी मांडले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला.प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संजय सावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तुषार पाटील यांनी, तर आभार प्रा. डी. एच. शिंदे यांनी मानले. यावेळी प्रा. उमेश शिंदे, प्रा.शशिकांत माळोदे यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० जणांनी नोंदणी केली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र