शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

आजपासून सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:56 AM

अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशाची संधी देण्यात आली होती.

नाशिक : अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार व विशेष फेरीतील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास १६ हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहेत. मात्र या सर्व फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेशाची संधी देण्यात आली होती. ही मुदत सोमवारी (दि.२६) संपली असून, आता प्रवेश घेऊ न शकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश खुले करण्यात आले आहेत.अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, तर दुसºया फेरीत ६ हजार ६४२ आणि तिसºया फेरीत ४ हजार १६१ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विशेष फेरीत ४ हजार १०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आली होती. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या व दुसºया फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालयत निवडले, तर तिसºया आणि चौथ्या फेरीत मात्र उपलब्ध पर्यांयापैकी प्रथम पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने दुसºया पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करून घेतल्याचे दिसून आले.पहिल्या दोन फे ºयांनतर अकरावीचा कटआॅफ चांगलाच घसरल्याचे दिसून आले होते. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या फेरीत सुरुवातीला ८० टक्के गुण असणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. त्यानंतर ६० टक्के असणाºया विद्यार्थ्यांना २४ आॅगस्टपर्यंत प्रवेशाची संधी देण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सोमवार (दि. २६) पासून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची इच्छा असून, त्यासाठी त्यांनी पुरवणी परीक्षाही दिली आहे. मात्र या परीक्षेता निकाल अद्याप जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी