शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नोटिसांचे सोपस्कार पूर्ण : जुने नाशिक-पंचवटीमध्ये २८५ धोकादायक वाडे अन् घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:49 IST

दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात.

ठळक मुद्देवाद थांबवा; सुरक्षा भक्कम करानागरिक, प्रशासनाचे हवे संयुक्त प्रयत्नमुंढे यांच्या भुमिकेकडे लक्ष

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा विभागांमधील गावठाणचा सर्व्हे करुन ३९७ धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेकडून दरवर्षी शहरातील जुने नाशिक, पंचवटी या गावठाण भागासह अन्यत्र असलेल्या धोकादायक वाडे-घरांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता पार पाडली जाते, ती यावर्षीही पार पाडली गेली. या नोटिसांच्या माध्यमातून संबंधितांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यातच जुने नाशिक, पंचवटी परिसरात बऱ्याच जुन्या वाड्यांमध्ये भाडेकरू-मालक वाद असल्याने या नोटिसांबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. बहुतांश वाड्यांचा वाद थेट न्यायप्रविष्ट आहे. जुने नाशिक आणि पंचवटी भागातील एकूण २८५ धोकादायक वाडे, घरे महापालिकेने धोक्याचे ठरविले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात. यावर्षीही काही घटना घडल्या आहेत. रविवारी घडलेली घटना ही अद्याप सर्वात मोठी व गंभीर घटना ठरली.

नागरिक, प्रशासनाचे हवे संयुक्त प्रयत्नरविवारच्या दुर्दैवी घटनेच्या रुपाने संबंधितांवर काळाची झडप? किंवा सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष? या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली असली तरी दोघा जीवांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले हे निश्चित. अशा घटनांची पुनरावृत्ती भविष्यात टाळण्यासाठी जुनेनाशिककरांनाच पुढे येऊन तोडगा काढावा लागणार आहे. प्रशासनासह ज्या लोकप्रतिनिधी घटनास्थळी उघड्या डोळ्यांने विदारक चित्र बघत होते त्यांना शासनदरबारी वाढीव चटईक्षेत्रासाठी पाठपुरावा करुन प्रश्न तडीस न्यावा लागणार आहे. 

मुंढे यांच्या भुमिकेकडे लक्षपालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

वाद थांबवा; सुरक्षा भक्कम कराजुन्या नाशकातील पडक्या वाड्यांची अवस्था बिकट आहे, हे सर्वश्रुत आहे. जुने नाशिककरदेखील हे जाणून आहे. महापालिका प्रशासनही याबाबत अनभिज्ञ नाही; मात्र वाडामालक-भाडेकरु हा वाद समस्याचे निराकरण करण्यामधील मोठा अडसर ठरत आला आहे. हा वाद आपआपसांत सांमजस्याने मिटवून संबंधितांनी आपली आणि परिसराची सुरक्षा भक्कम करण्याचा प्रयत्न करायला हवा. पडीक वाडे जेथे कोणीही राहत नाही, ते संबंधित मालकांनी तातडीने महापालिके कडे पत्र देऊन उतरवून घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन आजुबाजूच्या रहिवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. गावठाणासाठी लवकरच ‘क्लस्टर योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. परंतु या प्रकारात वाड्यांची सुधारणा करण्यास कोणीही तयार नसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांवर टांगती तलवार कायम आहे. 

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलBuilding Collapseइमारत दुर्घटनाNashikनाशिक