शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नोटिसांचे सोपस्कार पूर्ण : जुने नाशिक-पंचवटीमध्ये २८५ धोकादायक वाडे अन् घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:49 IST

दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात.

ठळक मुद्देवाद थांबवा; सुरक्षा भक्कम करानागरिक, प्रशासनाचे हवे संयुक्त प्रयत्नमुंढे यांच्या भुमिकेकडे लक्ष

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा विभागांमधील गावठाणचा सर्व्हे करुन ३९७ धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेकडून दरवर्षी शहरातील जुने नाशिक, पंचवटी या गावठाण भागासह अन्यत्र असलेल्या धोकादायक वाडे-घरांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता पार पाडली जाते, ती यावर्षीही पार पाडली गेली. या नोटिसांच्या माध्यमातून संबंधितांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यातच जुने नाशिक, पंचवटी परिसरात बऱ्याच जुन्या वाड्यांमध्ये भाडेकरू-मालक वाद असल्याने या नोटिसांबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. बहुतांश वाड्यांचा वाद थेट न्यायप्रविष्ट आहे. जुने नाशिक आणि पंचवटी भागातील एकूण २८५ धोकादायक वाडे, घरे महापालिकेने धोक्याचे ठरविले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात. यावर्षीही काही घटना घडल्या आहेत. रविवारी घडलेली घटना ही अद्याप सर्वात मोठी व गंभीर घटना ठरली.

नागरिक, प्रशासनाचे हवे संयुक्त प्रयत्नरविवारच्या दुर्दैवी घटनेच्या रुपाने संबंधितांवर काळाची झडप? किंवा सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष? या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली असली तरी दोघा जीवांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले हे निश्चित. अशा घटनांची पुनरावृत्ती भविष्यात टाळण्यासाठी जुनेनाशिककरांनाच पुढे येऊन तोडगा काढावा लागणार आहे. प्रशासनासह ज्या लोकप्रतिनिधी घटनास्थळी उघड्या डोळ्यांने विदारक चित्र बघत होते त्यांना शासनदरबारी वाढीव चटईक्षेत्रासाठी पाठपुरावा करुन प्रश्न तडीस न्यावा लागणार आहे. 

मुंढे यांच्या भुमिकेकडे लक्षपालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

वाद थांबवा; सुरक्षा भक्कम कराजुन्या नाशकातील पडक्या वाड्यांची अवस्था बिकट आहे, हे सर्वश्रुत आहे. जुने नाशिककरदेखील हे जाणून आहे. महापालिका प्रशासनही याबाबत अनभिज्ञ नाही; मात्र वाडामालक-भाडेकरु हा वाद समस्याचे निराकरण करण्यामधील मोठा अडसर ठरत आला आहे. हा वाद आपआपसांत सांमजस्याने मिटवून संबंधितांनी आपली आणि परिसराची सुरक्षा भक्कम करण्याचा प्रयत्न करायला हवा. पडीक वाडे जेथे कोणीही राहत नाही, ते संबंधित मालकांनी तातडीने महापालिके कडे पत्र देऊन उतरवून घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन आजुबाजूच्या रहिवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. गावठाणासाठी लवकरच ‘क्लस्टर योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. परंतु या प्रकारात वाड्यांची सुधारणा करण्यास कोणीही तयार नसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांवर टांगती तलवार कायम आहे. 

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलBuilding Collapseइमारत दुर्घटनाNashikनाशिक