शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

नोटिसांचे सोपस्कार पूर्ण : जुने नाशिक-पंचवटीमध्ये २८५ धोकादायक वाडे अन् घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:49 IST

दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात.

ठळक मुद्देवाद थांबवा; सुरक्षा भक्कम करानागरिक, प्रशासनाचे हवे संयुक्त प्रयत्नमुंढे यांच्या भुमिकेकडे लक्ष

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा विभागांमधील गावठाणचा सर्व्हे करुन ३९७ धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या होत्या. महापालिकेकडून दरवर्षी शहरातील जुने नाशिक, पंचवटी या गावठाण भागासह अन्यत्र असलेल्या धोकादायक वाडे-घरांना नोटिसा बजावण्याची औपचारिकता पार पाडली जाते, ती यावर्षीही पार पाडली गेली. या नोटिसांच्या माध्यमातून संबंधितांना धोकादायक भाग उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यातच जुने नाशिक, पंचवटी परिसरात बऱ्याच जुन्या वाड्यांमध्ये भाडेकरू-मालक वाद असल्याने या नोटिसांबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही. बहुतांश वाड्यांचा वाद थेट न्यायप्रविष्ट आहे. जुने नाशिक आणि पंचवटी भागातील एकूण २८५ धोकादायक वाडे, घरे महापालिकेने धोक्याचे ठरविले आहे. दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक झालेल्या वाड्यांचा जीर्ण भाग ओला होऊन माती ढासळते आणि वाड्यांच्या एक, दोन भींती तसेच संपुर्ण वाडा कोसळण्याच्या घटना घडतात. यावर्षीही काही घटना घडल्या आहेत. रविवारी घडलेली घटना ही अद्याप सर्वात मोठी व गंभीर घटना ठरली.

नागरिक, प्रशासनाचे हवे संयुक्त प्रयत्नरविवारच्या दुर्दैवी घटनेच्या रुपाने संबंधितांवर काळाची झडप? किंवा सुरक्षिततेकडे झालेले दुर्लक्ष? या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली असली तरी दोघा जीवांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले हे निश्चित. अशा घटनांची पुनरावृत्ती भविष्यात टाळण्यासाठी जुनेनाशिककरांनाच पुढे येऊन तोडगा काढावा लागणार आहे. प्रशासनासह ज्या लोकप्रतिनिधी घटनास्थळी उघड्या डोळ्यांने विदारक चित्र बघत होते त्यांना शासनदरबारी वाढीव चटईक्षेत्रासाठी पाठपुरावा करुन प्रश्न तडीस न्यावा लागणार आहे. 

मुंढे यांच्या भुमिकेकडे लक्षपालकमंत्री गिरीष महाजन यांनी मनपा प्रशासनाला आढावा घेऊन धोकादायक वाड्यांच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भुमिकेकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

वाद थांबवा; सुरक्षा भक्कम कराजुन्या नाशकातील पडक्या वाड्यांची अवस्था बिकट आहे, हे सर्वश्रुत आहे. जुने नाशिककरदेखील हे जाणून आहे. महापालिका प्रशासनही याबाबत अनभिज्ञ नाही; मात्र वाडामालक-भाडेकरु हा वाद समस्याचे निराकरण करण्यामधील मोठा अडसर ठरत आला आहे. हा वाद आपआपसांत सांमजस्याने मिटवून संबंधितांनी आपली आणि परिसराची सुरक्षा भक्कम करण्याचा प्रयत्न करायला हवा. पडीक वाडे जेथे कोणीही राहत नाही, ते संबंधित मालकांनी तातडीने महापालिके कडे पत्र देऊन उतरवून घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन आजुबाजूच्या रहिवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. गावठाणासाठी लवकरच ‘क्लस्टर योजना’ राबविण्याचे विचाराधीन आहे. परंतु या प्रकारात वाड्यांची सुधारणा करण्यास कोणीही तयार नसल्याने आजूबाजूच्या रहिवाशांवर टांगती तलवार कायम आहे. 

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलBuilding Collapseइमारत दुर्घटनाNashikनाशिक