शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मजूर मिळेना; लागवड होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:23 IST

आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्यात कांदा लागवड लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देयेवला तालुका : कांदा उत्पादकांवर भटकंतीची वेळ

जळगाव नेऊर : आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्यात कांदा लागवड लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले आहे.अवकाळी व परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातल्याने शेतपिकांसह कांदा रोपे सडली. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा बियाणे टाकली. यामुळे कांदा लागवडीचा कालावधी वाढला आहे. आता एकाचवेळी तालुकाभरात कांदा लागवडीला वेग आल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. त्यात ढगाळ वातावरण, धुक्यामुळे कांदा रोपे सडण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने औषध फवारणीचा खर्च वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.लागवड आणि कांदा काढणी ही कामे एकाच वेळी आल्याने मजुरांना सुगीचे दिवस आले आहे. ऐन हंगामात मजूर मिळवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकºयांना गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे.ठिबक, तुषार सिंचनावर भर४शासनाने प्रथमच ठिबक, तुषार सिंचनावर ८० टक्के अनुदान दिल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनावर कांदा लागवड केली आहे. यामुळे काही प्रमाणात मजुरांची कमी भासत नाही. तसेच सिंचनामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.लाल कांद्याचे भांडवल उन्हाळ लागवडीसाठी

उन्हाळ कांद्यापाठोपाठलाल कांद्यालाही चांगला दर मिळत आहे. बाजारभाव तीन-साडेतीन हजारांवर स्थिर राहिल्याने शेतकºयांच्या पदरात चार पैसे पडत आहे. लाल कांद्याचे भांडवल उन्हाळ कांदा लागवडीसाठी वापरले जात आहे. लाल कांद्यासाठी वापरलेले खते, औषधेही उन्हाळ कांद्यासाठी वापरले जात आहेत.पालखेड डावा कालव्याचा आधारमजुरांअभावी कांदा लागवड उशिराने होत असली तरी पालखेड डावा कालव्याचे रब्बी सिंचनासाठी दोन आवर्तन मिळणार असल्याने उशिराने होणºया कांदा लागवडीला याचा आधार आहे. पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अशा शेतकºयांना आहे. लागवड उशिरा होणार असली तरी पिकास भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे, असे शेतकºयांनी सांगितले.मी पाच ते सात वर्षांपासून ठिबक सिंचनावर कांदा, टमाटा पीक घेत आहे. वेळेची बचत होऊन कमी मेहनतीत आतापर्यंत चांगले उत्पादन मिळाले आहे. तसेच शासनाने ठिबक सिंचनावर ८० टक्के अनुदान दिल्याने मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत झाली आहे. तसेच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाले आहे.- रावसाहेब चव्हाणके, कांदा उत्पादक,

कांद्याची रोपे खराब होऊ लागल्याने व मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथून खासगी वाहनाने मजुरांची वाहतूक करावी लागली. त्यानंतर कांदा लागवड केली. त्यामुळे खर्चातही वाढ झाली. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कर्जातून मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.- साहेबराव झांबरे, कांदा उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा