शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

मजूर मिळेना; लागवड होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:23 IST

आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्यात कांदा लागवड लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देयेवला तालुका : कांदा उत्पादकांवर भटकंतीची वेळ

जळगाव नेऊर : आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्यात कांदा लागवड लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले आहे.अवकाळी व परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातल्याने शेतपिकांसह कांदा रोपे सडली. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा बियाणे टाकली. यामुळे कांदा लागवडीचा कालावधी वाढला आहे. आता एकाचवेळी तालुकाभरात कांदा लागवडीला वेग आल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. त्यात ढगाळ वातावरण, धुक्यामुळे कांदा रोपे सडण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने औषध फवारणीचा खर्च वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.लागवड आणि कांदा काढणी ही कामे एकाच वेळी आल्याने मजुरांना सुगीचे दिवस आले आहे. ऐन हंगामात मजूर मिळवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकºयांना गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे.ठिबक, तुषार सिंचनावर भर४शासनाने प्रथमच ठिबक, तुषार सिंचनावर ८० टक्के अनुदान दिल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनावर कांदा लागवड केली आहे. यामुळे काही प्रमाणात मजुरांची कमी भासत नाही. तसेच सिंचनामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.लाल कांद्याचे भांडवल उन्हाळ लागवडीसाठी

उन्हाळ कांद्यापाठोपाठलाल कांद्यालाही चांगला दर मिळत आहे. बाजारभाव तीन-साडेतीन हजारांवर स्थिर राहिल्याने शेतकºयांच्या पदरात चार पैसे पडत आहे. लाल कांद्याचे भांडवल उन्हाळ कांदा लागवडीसाठी वापरले जात आहे. लाल कांद्यासाठी वापरलेले खते, औषधेही उन्हाळ कांद्यासाठी वापरले जात आहेत.पालखेड डावा कालव्याचा आधारमजुरांअभावी कांदा लागवड उशिराने होत असली तरी पालखेड डावा कालव्याचे रब्बी सिंचनासाठी दोन आवर्तन मिळणार असल्याने उशिराने होणºया कांदा लागवडीला याचा आधार आहे. पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अशा शेतकºयांना आहे. लागवड उशिरा होणार असली तरी पिकास भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे, असे शेतकºयांनी सांगितले.मी पाच ते सात वर्षांपासून ठिबक सिंचनावर कांदा, टमाटा पीक घेत आहे. वेळेची बचत होऊन कमी मेहनतीत आतापर्यंत चांगले उत्पादन मिळाले आहे. तसेच शासनाने ठिबक सिंचनावर ८० टक्के अनुदान दिल्याने मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत झाली आहे. तसेच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाले आहे.- रावसाहेब चव्हाणके, कांदा उत्पादक,

कांद्याची रोपे खराब होऊ लागल्याने व मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथून खासगी वाहनाने मजुरांची वाहतूक करावी लागली. त्यानंतर कांदा लागवड केली. त्यामुळे खर्चातही वाढ झाली. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कर्जातून मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.- साहेबराव झांबरे, कांदा उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा