शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 21:13 IST

तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनात ब्लेमगेम सुरू

ठळक मुद्देधरणांच्या सुरक्षीतेकडे होतेय दुर्लक्षअनेक समित्या नियुक्त पण उपयोग नाही

नाशिक : तिवरे धरण फुटून जीवितहानी झाली. आता ब्लेम गेम सुरू झाल्यानंतर हे धरण चक्क खेकड्यांमुळे फुटल्याचे जलसंधारण राज्यमंत्री तर्कट तानाजी सावंत यांनी केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली असली तरी खेकड्यांमुळे अशाप्रकारे धरण किंवा कालवे फुटत नसतात. धरण फुटण्याची वेगवेगळी शास्त्रोक्त कारणे आहेत. धरणाच्या सुरक्षिततेविषयी अभियंत्याची उदासीनता आणि दुर्लक्ष तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची कोणत्याही सरकारची नसलेली मानसिकता असे अनेक दोष व्यवस्थेत असल्याचे स्पष्ट मत मेरीचे (महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था) माजी महासंचालक आणि जलतज्ज्ञ डी. एम. मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : तिवरे धरण फुटल्यानंतर खेकड्यांना दोष दिला जात आहे, त्याविषयी तुमचे काय मत आहे.मोरे : खेकड्यांमुळे धरण फुटते असे म्हणणे चुकीचे आहे. धरणाची रुंदी खूप असते. त्याशिवाय त्याची बांधणी मजबूत असते. त्यामुळे खेकड्यांनी धरण पोखरले म्हणून ते फुटले असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. धरण फुटण्याची अनेक कारणे आहेत. धरण बांधताना कामात त्रुटी असेल तर काळी माती योग्य पध्दतीने भरली नसेल किंवा त्याची दबाई योग्य पध्दतीने झाले नसेल तर धरण फुटू शकते, परंतु ते एकाएकी फुटत नाही. धरणातून बाहेर पडणारे पाणी नियमितपणे स्वच्छ असेल तर अडचण नसते. परंतु मातकट किंवा गढूळ पाणी बाहेर आले तर लक्षात घ्यायला पाहिजे. अशावेळी त्रुटीचा शोध घेऊन दुरुस्ती झाली पाहिजे. १९६१-६२ मध्ये पानशेत धरण फुटले तेव्हादेखील अशाच प्रकारे माती वाहून येत होती, त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु मानवी चुका झाल्यानंतर त्यात खेकड्यांमुळे धरण फुटले, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. पुण्यात पर्वतीजवळ कालवा फुटला होता, तेव्हादेखील हेच कारण देण्यात आले होते.

प्रश्न : धरण सुरक्षिततेबाबत सध्या व्यवस्था कशी आहे, त्याचा कितपत उपयोग होतो?मोरे : गेल्या दहा वर्षांपासून धरण सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी शासनाने अनेक समित्या नियुक्त केल्या आहेत. यात जलसंपदा खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सामावेश करून धरणांची पाहणी करून अभ्यासाचे काम देण्यात आले आहे, परंतु त्यातून काहीच साध्य झालेले नाही. संबंधित अभियंत्यांनी आणि खात्याने त्यातून काहीच धडा घेतला नाही. धरणांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक बॅँकेने निधी मंजूर केला आहे. ९४० कोटी रुपयांचा हा निधी आहे, परंतु त्यावर निर्णय नाही. तिवरे धरणाची दुर्घटना घडल्यानंतर मेरीत अलीकडेच नाशिकमध्ये बैठक झाली. त्यात १६७ धरणांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याचे ठरवण्यात आले.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकDamधरणGovernmentसरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRatnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण