शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

तिवरेच काय, पण कोणतंही धरण खेकड्यांमुळे फुटणं अशक्यच; तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 21:13 IST

तिवरे धरण फुटल्यानंतर प्रशासनात ब्लेमगेम सुरू

ठळक मुद्देधरणांच्या सुरक्षीतेकडे होतेय दुर्लक्षअनेक समित्या नियुक्त पण उपयोग नाही

नाशिक : तिवरे धरण फुटून जीवितहानी झाली. आता ब्लेम गेम सुरू झाल्यानंतर हे धरण चक्क खेकड्यांमुळे फुटल्याचे जलसंधारण राज्यमंत्री तर्कट तानाजी सावंत यांनी केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली असली तरी खेकड्यांमुळे अशाप्रकारे धरण किंवा कालवे फुटत नसतात. धरण फुटण्याची वेगवेगळी शास्त्रोक्त कारणे आहेत. धरणाच्या सुरक्षिततेविषयी अभियंत्याची उदासीनता आणि दुर्लक्ष तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची कोणत्याही सरकारची नसलेली मानसिकता असे अनेक दोष व्यवस्थेत असल्याचे स्पष्ट मत मेरीचे (महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था) माजी महासंचालक आणि जलतज्ज्ञ डी. एम. मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

प्रश्न : तिवरे धरण फुटल्यानंतर खेकड्यांना दोष दिला जात आहे, त्याविषयी तुमचे काय मत आहे.मोरे : खेकड्यांमुळे धरण फुटते असे म्हणणे चुकीचे आहे. धरणाची रुंदी खूप असते. त्याशिवाय त्याची बांधणी मजबूत असते. त्यामुळे खेकड्यांनी धरण पोखरले म्हणून ते फुटले असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. धरण फुटण्याची अनेक कारणे आहेत. धरण बांधताना कामात त्रुटी असेल तर काळी माती योग्य पध्दतीने भरली नसेल किंवा त्याची दबाई योग्य पध्दतीने झाले नसेल तर धरण फुटू शकते, परंतु ते एकाएकी फुटत नाही. धरणातून बाहेर पडणारे पाणी नियमितपणे स्वच्छ असेल तर अडचण नसते. परंतु मातकट किंवा गढूळ पाणी बाहेर आले तर लक्षात घ्यायला पाहिजे. अशावेळी त्रुटीचा शोध घेऊन दुरुस्ती झाली पाहिजे. १९६१-६२ मध्ये पानशेत धरण फुटले तेव्हादेखील अशाच प्रकारे माती वाहून येत होती, त्यामुळे त्याकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु मानवी चुका झाल्यानंतर त्यात खेकड्यांमुळे धरण फुटले, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. पुण्यात पर्वतीजवळ कालवा फुटला होता, तेव्हादेखील हेच कारण देण्यात आले होते.

प्रश्न : धरण सुरक्षिततेबाबत सध्या व्यवस्था कशी आहे, त्याचा कितपत उपयोग होतो?मोरे : गेल्या दहा वर्षांपासून धरण सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी शासनाने अनेक समित्या नियुक्त केल्या आहेत. यात जलसंपदा खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सामावेश करून धरणांची पाहणी करून अभ्यासाचे काम देण्यात आले आहे, परंतु त्यातून काहीच साध्य झालेले नाही. संबंधित अभियंत्यांनी आणि खात्याने त्यातून काहीच धडा घेतला नाही. धरणांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक बॅँकेने निधी मंजूर केला आहे. ९४० कोटी रुपयांचा हा निधी आहे, परंतु त्यावर निर्णय नाही. तिवरे धरणाची दुर्घटना घडल्यानंतर मेरीत अलीकडेच नाशिकमध्ये बैठक झाली. त्यात १६७ धरणांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याचे ठरवण्यात आले.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकDamधरणGovernmentसरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पRatnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण