शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यातील झाडे तोडण्यापेक्षा पुनर्रोपणाची गरज : अश्विनी भट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:44 IST

नाशिक : शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देब्लॉक प्लॅँटेशन चांगलेचरस्त्याच्या कडेलाही वृक्षारोपणाची गरज

नाशिक: शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले. नाशिकमधील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या भट यांनी यापूर्वीदेखील मुंबई- आग्रा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी वृक्षतोडीस विरोध करण्यासाठी न्यायालयीन लढा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवादप्रश्न : शहरातील वृक्षतोडीला तुमचा विरोध का?भट : महापालिकेचे काम मुळातच हा पर्यावरण संवर्धनाचे असले पाहिजे. नाशिकचा समावेश प्रदूषणकारी शहरांच्या यादीत झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पर्यावरण राखले पाहिजे. रस्त्याच्या कडेला दर दहा मीटर अंतरावर स्थानिक प्रजातीची झाडे लावली पाहिजेत, असा नियम आहे. परंतु, तसे होत नाही. महापालिकेच्या वतीने झाडे तोडण्यात जेवढे स्वारस्य दाखविले जातो तेवढे झाडे तोडण्यात स्वारस्य दाखविले जात नाही. किमान झाडे तोडायची तर शास्त्रोक्त पद्धतीने काढून त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. धुळ्यात २१ जूनी झाडे पुनर्रोपणानंतर टिकली आहेत, मात्र नाशिकमध्येच ती का टिकत नाही याचा शोध घेतला पाहिजे.प्रश्न : महापालिकेच्या वतीनेदेखील वृक्षलागवड केली जाते, गेल्या वर्षी तर देवराई उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याविषयी काय सांगाल?भट : महापालिकेने गेल्या वर्षभरात चांगले वृक्षारोपण केले आहे. ब्लॉक प्लॅँटेशनदेखील केले आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, अशाप्रकारची झाडे लावणे बंधनकारकच आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेली जुनी पन्नास - शंभर वर्षांपूर्वीची झाडे तोडायची आणि त्या बदल्यात ब्लॉक प्लॅँटेशन करायचे याला कोणताही अर्थ नाही. रस्त्याच्या कडेलादेखील झाडे लावणे बंधनकारक असून, तेथे झाडे लावणे बंधनकारच आहे.प्रश्न : रस्त्यातील झाडे तोडण्यात गैर काय?भट : महापालिका रस्त्याच्या कडेला झाडे लावतच नसल्याचे लक्षात आल्याने यापूर्वीच न्यायालयाने देशी प्रजातीची झाडे हटवू नये, असे आदेश दिला आहे. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण होत नाही. रस्त्यालगतही रुंदीकरण करून डांबरीकरण करताना बुंधे मोकळे ठेवले जात नाही. त्यामुळे झाडे फार काळ टिकत नाही. रस्त्यातील झाडांमुळे अपघात होतात, त्यामुळे ती तोडावा अशी एक मागणी आहे. परंतु नीट तपास केला तर झाडांमुळे अपघातात बळी पडणाऱ्यांपेक्षा रस्ता अपघातात बळी जाणाºया पादचाºयांची संख्या अधिक आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होतो त्यांचे दु:ख मी समजू शकते. परंतु रस्त्यात येणाºया झाडावर फ्लोरोसंट कलरने पेंट करण्याचे साधे सौजन्य महापालिका दाखवत नाही, केवळ खिळ्याने रिफ्लेक्टर ठोकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे झाडांवर मोटर आदळून होणाºया अपघातांमध्ये झाडे नव्हे तर महापालिकेचा गलथान कारभार कारणीभूत आहे.मुलाखत-संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरण