शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
2
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
5
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
6
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
7
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
8
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
9
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
10
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
11
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
12
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
13
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
14
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
15
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
16
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
17
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
18
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
19
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
20
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी

रस्त्यातील झाडे तोडण्यापेक्षा पुनर्रोपणाची गरज : अश्विनी भट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:44 IST

नाशिक : शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देब्लॉक प्लॅँटेशन चांगलेचरस्त्याच्या कडेलाही वृक्षारोपणाची गरज

नाशिक: शहरात रस्त्यात झाडे येत असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याचे निमित्त करून महापालिकेने ८१ झाडांवर कु-हाड चालविण्याची तयारी केली आहे. मात्र, झाडे तोडण्यापेक्षा त्याचे पुनर्रोपण केले पाहिजे असे मत नाशिक कृती समितीच्या कार्यकर्त्या आणि पर्यावरणप्रेमी अश्विनी भट यांनी व्यक्त केले. नाशिकमधील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या भट यांनी यापूर्वीदेखील मुंबई- आग्रा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी वृक्षतोडीस विरोध करण्यासाठी न्यायालयीन लढा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवादप्रश्न : शहरातील वृक्षतोडीला तुमचा विरोध का?भट : महापालिकेचे काम मुळातच हा पर्यावरण संवर्धनाचे असले पाहिजे. नाशिकचा समावेश प्रदूषणकारी शहरांच्या यादीत झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पर्यावरण राखले पाहिजे. रस्त्याच्या कडेला दर दहा मीटर अंतरावर स्थानिक प्रजातीची झाडे लावली पाहिजेत, असा नियम आहे. परंतु, तसे होत नाही. महापालिकेच्या वतीने झाडे तोडण्यात जेवढे स्वारस्य दाखविले जातो तेवढे झाडे तोडण्यात स्वारस्य दाखविले जात नाही. किमान झाडे तोडायची तर शास्त्रोक्त पद्धतीने काढून त्यांचे पुनर्रोपण केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. धुळ्यात २१ जूनी झाडे पुनर्रोपणानंतर टिकली आहेत, मात्र नाशिकमध्येच ती का टिकत नाही याचा शोध घेतला पाहिजे.प्रश्न : महापालिकेच्या वतीनेदेखील वृक्षलागवड केली जाते, गेल्या वर्षी तर देवराई उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याविषयी काय सांगाल?भट : महापालिकेने गेल्या वर्षभरात चांगले वृक्षारोपण केले आहे. ब्लॉक प्लॅँटेशनदेखील केले आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, अशाप्रकारची झाडे लावणे बंधनकारकच आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेली जुनी पन्नास - शंभर वर्षांपूर्वीची झाडे तोडायची आणि त्या बदल्यात ब्लॉक प्लॅँटेशन करायचे याला कोणताही अर्थ नाही. रस्त्याच्या कडेलादेखील झाडे लावणे बंधनकारक असून, तेथे झाडे लावणे बंधनकारच आहे.प्रश्न : रस्त्यातील झाडे तोडण्यात गैर काय?भट : महापालिका रस्त्याच्या कडेला झाडे लावतच नसल्याचे लक्षात आल्याने यापूर्वीच न्यायालयाने देशी प्रजातीची झाडे हटवू नये, असे आदेश दिला आहे. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण होत नाही. रस्त्यालगतही रुंदीकरण करून डांबरीकरण करताना बुंधे मोकळे ठेवले जात नाही. त्यामुळे झाडे फार काळ टिकत नाही. रस्त्यातील झाडांमुळे अपघात होतात, त्यामुळे ती तोडावा अशी एक मागणी आहे. परंतु नीट तपास केला तर झाडांमुळे अपघातात बळी पडणाऱ्यांपेक्षा रस्ता अपघातात बळी जाणाºया पादचाºयांची संख्या अधिक आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होतो त्यांचे दु:ख मी समजू शकते. परंतु रस्त्यात येणाºया झाडावर फ्लोरोसंट कलरने पेंट करण्याचे साधे सौजन्य महापालिका दाखवत नाही, केवळ खिळ्याने रिफ्लेक्टर ठोकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे झाडांवर मोटर आदळून होणाºया अपघातांमध्ये झाडे नव्हे तर महापालिकेचा गलथान कारभार कारणीभूत आहे.मुलाखत-संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरण