शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:51 IST

अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे.

ठळक मुद्देदक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचलाउत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा, नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा

नाशिक : नाशिकचे किमान तपमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १४ अंशावरून पारा थेट १७ अंशाच्या पुढे गेला आहे. एकूणच किमान तपमानात वाढ होताना दिसत असली तरी नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले आहे. कारण ‘ओखी’ वादळ गुजरातमध्ये धडकल्यामुळे नाशिकवरही त्याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचला आहे. यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. नाशिककरांना रेनकोटसोबत उबदार कपड्यांचाही आज वापर करावा लागत आहे. दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. उबदार कपड्यांसह रेनकोट परिधान करुन दुचाकीवरून महिला-पुरूष नोकरदार वर्ग मार्गस्थ होताना दिसून आले. एकूणच १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा असतानाही नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव काही तासांपासून घेत आहेत. कारण ‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून मासेमा-यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळNashikनाशिकRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय