शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:51 IST

अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे.

ठळक मुद्देदक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचलाउत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा, नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा

नाशिक : नाशिकचे किमान तपमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १४ अंशावरून पारा थेट १७ अंशाच्या पुढे गेला आहे. एकूणच किमान तपमानात वाढ होताना दिसत असली तरी नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले आहे. कारण ‘ओखी’ वादळ गुजरातमध्ये धडकल्यामुळे नाशिकवरही त्याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचला आहे. यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. नाशिककरांना रेनकोटसोबत उबदार कपड्यांचाही आज वापर करावा लागत आहे. दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. उबदार कपड्यांसह रेनकोट परिधान करुन दुचाकीवरून महिला-पुरूष नोकरदार वर्ग मार्गस्थ होताना दिसून आले. एकूणच १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा असतानाही नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव काही तासांपासून घेत आहेत. कारण ‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून मासेमा-यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळNashikनाशिकRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय