शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 14:51 IST

अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे.

ठळक मुद्देदक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचलाउत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा, नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा

नाशिक : नाशिकचे किमान तपमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. १४ अंशावरून पारा थेट १७ अंशाच्या पुढे गेला आहे. एकूणच किमान तपमानात वाढ होताना दिसत असली तरी नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले आहे. कारण ‘ओखी’ वादळ गुजरातमध्ये धडकल्यामुळे नाशिकवरही त्याचा मोठा प्रभाव जाणवू लागला आहे. पहाटेपासून शहरात मळभ दाटले असून रिमझिम पावसाबररोबरच हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरकत ‘ओखी’ गुजरातमध्ये पोहचला आहे. यामुळे अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदूरबार आदि जिल्हे प्रभावीत झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. नाशिकमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला असून हवेत कमालीचा गारवा जाणवत आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले आहे. नाशिककरांना रेनकोटसोबत उबदार कपड्यांचाही आज वापर करावा लागत आहे. दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. उबदार कपड्यांसह रेनकोट परिधान करुन दुचाकीवरून महिला-पुरूष नोकरदार वर्ग मार्गस्थ होताना दिसून आले. एकूणच १७ अंशाच्या पुढे किमान तपमानाचा पारा असतानाही नाशिककर सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव काही तासांपासून घेत आहेत. कारण ‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून मासेमा-यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळNashikनाशिकRainपाऊसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय