शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

नाशिकच्या महापौरपदाच्या निवडणूकीमुळे साऱ्यांत पक्षातील फाटाफुट उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:31 IST

नाशिक- महापालिकेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपने सत्ता राखली असली तरी त्यातून सर्वाच पक्षातील वादावाद आणि फाटाफुट उघड झाली आहे. पक्ष किंवा गठबंधन हा एकसंघ ठेवण्यासाठीच असला तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. घोडेबाजारात निष्ठा विकल्या जातात आणि पद, प्रतिष्ठा न बाळगता सारेच या बाजारात विकण्यास सज्ज असतात. नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली असल्याने हे सारे प्रकार बाहेर पडले नसले तरी प्रत्यक्षात मात्र निवडणूक बिनविरोध होण्यामागे फिस्कटलेली आर्थिक गणिते हेच मोठे कारण ठरले आहेत.

ठळक मुद्देभाजपत उमेदवारीवरून नाराजीविरोधी पक्षांना गटबाजी भोवलीभाजप ठरली सरस

संजय पाठक,नाशिक- महापालिकेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर भाजपने सत्ता राखली असली तरी त्यातून सर्वाच पक्षातील वादावाद आणि फाटाफुट उघड झाली आहे. पक्ष किंवा गठबंधन हा एकसंघ ठेवण्यासाठीच असला तरी प्रत्यक्षात तसे होत नाही. घोडेबाजारात निष्ठा विकल्या जातात आणि पद, प्रतिष्ठा न बाळगता सारेच या बाजारात विकण्यास सज्ज असतात. नाशिकच्यामहापौरपदाचीनिवडणूक बिनविरोध झाली असल्याने हे सारे प्रकार बाहेर पडले नसले तरी प्रत्यक्षात मात्र निवडणूक बिनविरोध होण्यामागे फिस्कटलेली आर्थिक गणिते हेच मोठे कारण ठरले आहेत.नाशिकच्या महापौरपदासाठी शुक्रवारी (दि.२२) झालेल्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी आणि उपमहापौरपदी भिकुबाई बागूल बिनविरोध निवडून आले. यशासारखे यश नाही, त्यामुळे त्यातील अनेक त्रुटींवर पांघरूण घातले गेले. मात्र प्रत्यक्षात भाजपसह साºयाच पक्षातील पितळ उघडे पडले.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आल्यानंतर पहिले वर्ष सुखात जाते, नंतर मात्र खटके उडू लागतात मग भांड्याला भांडे लागते आणि अखेरीस मात्र थेट पक्षाच्या कारवाईला देखील कोणी भीत नाही. हे चित्र दर पंचवार्षिक कारकिर्दीतील हे आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाले असल्याने पहिल्यावेळी रंजना भानसी यांची निवड झाली. मात्र नंतर भाजपत यंदा सत्तापदावरून वाद सुरू झाले. महापालिकेतील काही नगरसेवक दरवर्षी सत्तापदे घेतात आणि सर्वच ठिकाणी ते इच्छूक असतात. त्यामुळे भाजपत अस्वस्थता होती. पक्षात मुळचे केवळ ११ नगरसेवक आहेत. बाकी बाहेरचे नगरसेवक असल्याने या पक्षांत केवळ बाहेरील पक्षांना न्याय दिले जात असल्याची भावना होती ती दूर करण्यात आली खरी मात्र त्यासाठी पक्षाला अनेक प्रकारच्या संघर्ष आणि अभिनिवेशाला सामोरे जावे लागले. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर काहींनी अन्य पक्षाच्या उमेदवारीसाठी देखील मतदानाची तयारी दर्शविली तर पक्षातील दहा ते बारा नगरसेवक अगोदरच फुटले असल्याचे स्पष्ट झाले होते. ते नंतर पक्षातच परत आले खरे परंतु ते येण्यामागे विरोधी पक्षातील गणिते न जुळल्याचे प्रमुख कारण होते.

विरोधी पक्षातील शिवसेना हा प्रमुख पक्ष होता. या पक्षाला बहुमत मिळवणे सोपे नव्हते. परंतु त्यांनी धारिष्ट केले खरे असले तरी कोणतेही नगरसेवक मते देण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही त्याचे कारण वेगळेच असते आणि ते कारण म्हणजे विरोधातील काही पक्षांची अपेक्षा पूर्ती करण्यात शिवसेनेला यश आले नाही. सहाजिकच उमेदवारीसाठी याच पक्षात होत असलेली रस्सीखेच थांबली. मात्र या पक्षात उमेदवारीसाठी असलेली रस्सीखेच इतकी शिगेला पोहोचली होती की अमुक उमेदवाराला संधी दिल्यास बाहेर पडू अशा धमक्या देखील देण्यात आल्या.

कॉँग्रेस मध्ये दोन गट होते त्यात केवळ डॉ. हेमलता पाटील एकाकी पडल्या. आधी शिवसेनेबरोबर राहण्यास कटीबध्दता दाखवणाºया कॉँग्रेसच्या काही नगरसेवकांनी घुमजाव केले. पक्षातील गटबाजी मिटवणे प्रदेश नेत्यांना देखील शक्य झाले नाही. मनसेत देखील पक्षाच्या पाच नगरसेवकांपैकी तीन मतप्रवाह होते अखेरीस राज ठाकरे यांनी भाजपाला पाठींबा दिल्याने हा विषय बाजूला पडला. मनसेने भाजपला पाठिंबा का दिला, या विषयी तर्क वितर्क लढविले जात आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरElectionनिवडणूकBJPभाजपा