शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अतिक्रमणातून उभी राहणार घरकुल योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:20 IST

नाशिक : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते.तथापी योजना राबवितांना पुरेशी शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने अनेक ...

ठळक मुद्दे२५ हजार कुटूंबाना लाभ : नव्या वर्षात होणार गृहप्रवेश

नाशिक: शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल योजना राबविली जाते.तथापी योजना राबवितांना पुरेशी शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येतात. जागेअभावी संबंधित लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली घरे अधिकृत करण्यात करण्याची कारवाई सुरू असून नाशिक जिल्ह्यात सुमारे २५ हजार कुटूंबांना याचा लाभ होणार आहे.ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर निवासासाठी करण्यात आलेली अतिक्रमणे नियतिम करण्याच्या धोरणांतर्गत जिल्ह्यातील अतिक्र मणांची नोंद घेण्यात आली असून जिल्हयात ४९२ ग्रामपंचायतीमध्ये जवळपास २४,६०० नोंदी झाल्या आहेत. यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणुन ग्रामपंचायत स्तरावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारची २५,४३४ अतिक्रमणे आहेत. संगणकीय प्रणालीवर अतिक्र मणधारकांच्या नोंदीबाबत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतच्या हरकती नोंदविल्या आहेत. जिल्हयात जवळपास २४,६०० नोंदी झाल्या असून, यावर कुणाचाही आक्षेप राहू नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठळक, दर्शनी भागात अतिक्र मणधारकांची यादी लावण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.या योजनेतंतर्गत जवळपास ९३ टक्के काम पुर्ण झाले असून २५ हजाराच्या जवळपास अतिक्रमणांचा मुद्या निकाली निघालेला आहे. यामुळे संबंधितांना दिलासा मिळाला असून शासनाची योजनाही या माध्यमातून पुर्णत्वास येणार आहे. ज्या जमिनींवर अतिक्रमणे आहेत आणि मोठा जनसमुदाय असेल अशी ही घरे असल्यामुळे त्यांचा विचार करून अतिक्रमण नियमित करण्याबाबतचे धोरण शासनाने घेतले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद